अमरावती – उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका
अमरावती जिल्हातील वलगाव येथील आपले सरकार सेतू केंद्र अपंग / महिला बचत गटास देण्याकरिता जिल्हाधिकारी अमरावती मार्फत जाहिरात निघाली होती. परंतु जाहिरातीतील शर्थी व अटीत अपात्र तसेच बनावटी कागदपत्रे बनविण्याऱ्या शेख हमीद शेख वाहेद यास आर्थिक देवाणघेवाणीतून आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आल्याने वलगाव येथील पात्र उमेदवार अपंग सागर संजय तसरे दि. १५ बुधवार पासून पब्लिक पार्लमेंट च्या वतीने आमरण उपोषणास बसले होते. आज दि. 23 गुरुवार रोजी आपले सरकार सेतू केंद्राचे अधीक्षक चंद्रपाल मेश्राम यांनी रणजित भोसले उपजिल्हाधिकारी अमरावती यांचे पत्र आणून दिले तसेच सागर तसरेला ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आले. त्या पत्रानूसार शेख हमीद शेख वाहेद यांचे आपले सरकार सेतू केंद्र रद्द करण्यात आले व पात्रतेचा कसोटीत अपंग सागर तसरेला आपले सरकार सेतू केंद्र देण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर असे कि महाराष्ट्र सरकारने गावातील नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळाव्या म्हणून आपले सरकार सेतू केंद्र गावागावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर शेख हमीद शेख वाहेद यांना आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आले. या संबंधात अपंग सागर संजय तसरे यांनी माहितीच्या अधिकारात शेख हमीद शेख वाहेद यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळविली असता शेख हमीद शेख वाहेद यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र दि. २९/१२/२०२७ जिल्हा शल्य चिकित्सकाचे खोटे व बनावटी प्रमाणपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाली. या विरोधात सागर ठाकरेने दि. १५ बुधवार पासून आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याने पब्लिक पार्लमेंटचे अँड. सिद्धार्थ गायकवाड, फूजैल सय्यद, मीनाताई नागदिवे सुषमा मोरे वहिदा नायक अविनाश गोंडाने श्रीकृष्ण तातड, अँड. रमेश तंतरपाडे यांनी सहकार्य केल्याबद्दल सागर संजय तसरे यांनीं आभार व्यक्त केले