हिंगणघाट– मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे.या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्यांच्या कार्य संस्कृतीवर सुद्धा प्रभाव पडतो . वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी व प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातच असावी लागते असे विचार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री जी.एस.भगत सर यांनी व्यक्त केले.ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयस वाचनालयाला ग्रंथ खरेदी करीता पाच हजार रूपयाची देणगी देण्यासाठी श्रेयस वाचनालयात आले असतांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे श्री.संजय वानखेडे,श्री.राजू फुलझेले,श्री.राजू नगराळे ,श्री.परशुरामजी वाघमारे,श्री.निळकंठ भिमटे,अॕड रमेश थुल,श्रेयस वाचनालयाचे प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे,सौ.सुजाता नगराळे ,श्रेयस नगराळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री शशिमोहन थुटे यांनी केले.
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा