हिंगणघाट 13 एप्रिल संध्याकाळी निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात अचानक बदल होऊन पाण्यास सुरुवात झाली यामध्ये मार्केटमधील शेडच्या बाहेर असलेले व्यापारी व शेतकऱ्याचे मालाचे नुकसान झाले.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेडची व्यवस्था असतानासुद्धा नुकसान होते , याला काही प्रमाणात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक जबाबदार आहे हे लक्षात येते
शेतकऱ्या कडून व्यापारी माल खरेदी करते परंतु ते उचलण्यासाठी अनेक दिवस लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य विकण्याच्या सीजन मध्ये सुद्धा धान्य शेडच्या बाहेरच ठेवावा लागतो. यामध्ये व्यवस्थापन यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले (व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेले धान्य किती दिवसात उचलण्यात आले पाहिजे ?) यासाठी नियम असताना सुद्धा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होते व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व व्यापारी या वर्गांना नुकसान झाले हेच यावरून लक्षात येते .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा