अतिवृष्टीचा लाभ न मिळाल्यास रस्त्यावर उतरूj. जिल्हा परिषद सदस्य श्री..राजेंद्र लहाने

0
463

 

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

” वालूर महसूल मंडळासह तालुक्यातील इतर गावातील शेतकर्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळालाच पाहिजे,प्रशासनाने कोणत्या निकषांवर महसूल मंडळातील अतिवृष्टीची नोंद केली याचे सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले.वालूर महसूल मंडळ व इतर गावांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवले तर शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा वालूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र लहाने (काका)यांनी प्रशासनला दिला आहे.
सेलू तालुक्यात सर्वच पाचही महसूल मंडळात या वर्षी अतिवृष्टीने शेतीसह खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस, तुर, सोयाबीन भाजी पाला,फळबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शासनाने प्रत्यक्षात शेत शिवारातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी असताना काही महसूल मंडळ व गावे या अतिवृष्टी अनुदानाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे. तालूक्यातील पाचही महसूल मंडळातील गावातील शेतकर्यांना सरसरगट अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे.शासनाने अतिवृष्टी लाभ देण्यासाठी दुजाभाव केल्यास शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा वालूर (ता.सेलू) राजेंद्र लहाने यांनी दिला आहे. यावेळी सेलू पंचायत समितीचे उपसभापती श्री. गणेश मुंडे, नव युवक मित्र मंडळाचे श्री लिंबाजी कलाल, सतीश कलाल, अमोल काकडे कान्हेरवाडीकर, हारून सेठ अन्सारी, माणिक काजळे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here