ईसापूर धरणाच्या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा: खासदार हेमंत पाटील

0
296

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव

हिंगोली लोकसभा मतदार संघात असलेल्या पैनगंगा नदीवर ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास दरवाजे उघडावे लागणार आहे. यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षास सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष देण्यास हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here