निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक)
नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी आज सकाळी नांदगाव येथील चांडक प्लाँट भागातील दोन महीला आपल्या तीन चिमुकल्यासह रेल्वेे अंडरपासमध्ये पाणी असल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस आल्याने रेल्वेखाली चिरडुन स्वाती रविंद्र शिंदे या महीलेचा दुर्देवी मृत्यु झाला.सदर महीला गरीब होतकरु रवि शिंदे यांच्या पत्नी होत्या.रेल्वे प्रशासन व नांदगाव नगरपालिकेच्या भोंगळ काराभारामुळे बनविण्यात आलेल्या अंडरपासमुळे हा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे त्याचे शल्य मनाला टोचल्याने आपण नगरसेवक असुन न पा च्या अट्टाहासामुळे येथील जनतेचा पुरामुळे उद्भवलेल्या येण्या जाण्याच्या समस्या साेडवु शकलो नाही अशी खंत व्यक्त करत या वाँर्डातील नगरसेवक नितिन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नितीन जाधव यांनी असा राजीनामा देणे नगरपलिकेस काळे फासण्यासारखे आहे म्हणुनच त्वरीत अंडरपासचा प्रश्न मिटवा नाहीतर नगरपरीषद बरखास्त करा अशी संतप्त प्रतिक्रीया नांदगावमधील जनतेकडुन केली जात आहे.