गजानन सोनटक्के जळगाव जा
या निवेदनात नमूद करण्यात आले की मागील वर्षी covid-19 मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,महात्मा फुले जयंती व इतर थोर महापुरुषांच्या जयंती, उत्सव प्रशासनाच्या विनंतीमुळे 100% साजऱ्या झालेल्या नाहीत सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून जयंती घराघरात साजरी केली आपण covid-19 चे कारण पुढे करून जयंती वर बंदी घालत आहात,असे पाहता येथून पुढे माणसांना या विषाणूसोबत जीवन जगावे लागणार आहे,महापुरुषांच्या जयंती हा सण प्रत्येक वेळी आपण नियमांची अट घालून थांबू शकत नाही आपण जनभावनांचा आदर केला पाहिजे ज्याना आजाराची भीती आहे अशा लोकांनी सार्वजनिक ठिकाणी येऊ नये परंतु जे लोक नियमांचे पालन करून जर कार्यक्रम करीत असतील तर त्यांना हे अडविणे चुकीचे आहे जयंती ही प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्याची व जनभावनेचा आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे संकट वाढत आहे त्यामुळे लॉकडाऊन लावून जनतेवर निर्बंध लागलेले आहेत आरोग्य सेवा पुरविण्यात शासन अपयशी ठरत आहे वास्तविक पाहता सरकारने आरोग्य सुविधा वर भर द्यावा व इतर प्रतिबंधक उपाय करावे, निर्बंधांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे ,लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत गर्दीमुळे कोरोना वाढत असेल तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ कडक निर्बंध न लावता जनतेला नियमाचे पालन करण्याचे आवाहन करावे व आपण जनतेवर लावलेले कडक निर्बंध मागे घेऊन जमावबंदी आदेश मागे घ्यावा व जनतेला होत असलेला त्रास थांबावा या निवेदनावर शंकरराव इंगळे ,अरुण पारवे ,देवानंद दामोदर, सुनील बोदडे, साहेबराव भगत महादेव बोदडे ,अभिषेक बोदडे, सुभाष शिरसाट ,विजय तायडे ,विलास तायडे सुरेश वाघोदे इत्यादींच्या सह्या आहेत