यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील नगर परिषदच्या माध्यमातुन विस्तारीत क्षेत्रातील राहणाऱ्या नागरीकांसाठी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनी पाईपलाईन वरून नळ जोडणीच्या कामास सुरुवात झाली असुन , नळजोडणीची मुदत व जोडणीसाठी लागणारी रक्कम ही कमी करावी अशी मागणी या परिसरातील युवकांनी नगर परिषदे मुख्यधिकारी यांच्याकडे केली आहे . या संदर्भात नगर परिषदकडे केलेल्या मागणीच्या निवेदनात युवकांनी म्हटले आहे की , सद्या देशात व राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे संचारबंदी लागलेली असुन , सर्वनागरीकांची आर्थिक परिस्थिती सर्वसम्मान झाली आहे . अशा परिस्थित नगर परिषदच्या वतीने सुमारे ५ कोटी७५ लाख२ रुपये खर्च करून नव्या जलकुंभाची उभारणी केली असुन विस्तारीत क्षेत्रातील विविध भागामध्ये या जलकुंभावरून नागरीकांना मुबलक स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरीता जलवाहिनी पाईपलाईव टाकण्यात आली असुन या पाईपलाईन वरून नगरपरिषदच्या वतीने नळजोडणीच्या कार्यास सुरुवात करण्यात आली असुन , यासाठी नगर परिषद कडुन नवीन नळजोडणी करीता ५ हजार६५० रुपये प्रत्येकी अकरणी करण्यात येत आहे .कोरोना संकटाच्या काळात ही नळजोडणीची रक्कम अधिक वाटत असुन , तरीही रक्कम ३०००ते ३५०० पर्यंतची अकारणी करण्यात यावी अशी मागणी गणपती नगर , तिरूपत्तीनगर व आयशानगर या क्षेत्रातील राहणाऱ्या अशपाक शाह, सुलेमान शेख लुकमान, रईस शेख बिस्मिल्ला , सईद खाटीक ,युसुफ शेख इस्हाक, रऊफ नसिर खान , रिजवान हारीस शेख आदींनी नगर परिषद अमोल मदने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .