राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रपूर मनपा मध्ये सोडल्या कोंबड्या

0
196

 

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृतजल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला परंतु आज 5 वर्ष लोटून गेले तरी ह्या योजनेच्या कंत्राटदाराने काम तर पूर्ण केले नाही आणि जे काम केले ते पण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले.
चंद्रपूर शहरा मध्ये पाईप लाईन टाकलेल्या भागात जे गट्टू लावण्यात आले ते गट्टू पूर्ण पणे जमिनीच्या आत गेले ह्याचाच अर्थ काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले.
ह्या विषयाला घेऊन वारंवार प्रत्येक झोन मध्ये नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन निवेदन देण्यात आले परंतु मनपा चंद्रपूर ने दुर्लक्ष केले म्हणून ह्या विषयाला घेऊन आज दिनांक 12/8/2021 ला अमृत जल योजनेच्या भोंगळ कारभार आणि ह्या भोंगळ कारभार बघून अधिकारी दुर्लक्ष करीत असलेल्या मुळे आज महापालिका चंद्रपूर येथे कंत्राटदारावर चौकशी लावावी ह्या करिता धिक्कार आंदोलन करण्यात आले आणि अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी महापालिकेत कोंबड्या सोडण्यात आले सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक चंद्रपूर चे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here