शिक्षक वाटणार पाच हजार राष्ट्रध्वज

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद येथे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशात सर्वच स्तरावर आजादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.यानिमि-ताने पंचायत समिती चे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख याच्या योगदानातून पाच हजार तिरंगा ध्वज नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Comment