संग्रामपूर तालुक्यातील करमोळा शिवारातील शेतातील बोर वेल विद्युत कनेक्शन तोडले व मीटर पेटीतील स्टार्टर व केबल चोरून नेले अशी तक्रार नऊ मे रोजी करमोळा येथील सुखदेव नामदेव थोटे यांनी संग्रामपूर पोलीस स्टेशनला दिली आहे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असावे अशी लेखी तक्रार दिली आहे परंतु संग्रामपूर पोलीस स्टेशन मार्फत सात ते आठ दिवस उलटूनही कोणतीच चौकशी झाली नाही परिणामी शेतकऱ्याच्या शेतातील असलेले संत्र्याची झाडे ही पाणी अभावी सुकत आहे व चौकशी होत नसल्याने या करणास शेतकऱ्याने पोलीस स्टेशन जबाबदार धरले आहे तरी या घटनेची लवकरात लवकर चौकशी करावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे