Home Breaking News अतिवृष्टी व ढगफुटीतुन वगळन्यात आलेले गावे समाविष्ट करा व हलगर्जी करण्याऱ्या अधिकारी...

अतिवृष्टी व ढगफुटीतुन वगळन्यात आलेले गावे समाविष्ट करा व हलगर्जी करण्याऱ्या अधिकारी वर कारवाई करा

अन्यथा आंदोलन करण्यात येईल
भाजप चे मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन

ढगफुटी व अतिवृष्टी च्या यादीतून जी गावे वगळण्यात आली ती पुन्हा समाविष्ट करा व हलगर्जी करणाऱ्या तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही आंदोलन करू असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री याना संग्रामपूर तालुका भाजप च्या वतीने दि 9 नोव्हेंबर रोजी देण्यात आले
सप्टेंबर महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील बऱ्याच गावात ढगफुटी व अतिवृष्टी सारखा पाऊस झाला त्या मुळे नदी नाल्याला पूर आल्यामुळे शेतात पाणी घुसले व शेती खरडून गेली व या परिसरातील सर्व उद्वस्त झाली याच्या वृत्तपत्र मध्ये बातम्या प्रकाशित पण झाल्या त्या नंतर महसूल मंडळ कामावर लागले व त्या नुकसान झालेल्या शतीचे व पिकाचे पंचनामे केले मात्र ज्या वेळेस नुकसानभरपाई आली त्या यादीत व त्या निधीत बऱ्याच गावाला वगळण्यात आले या मध्ये टाकळी पंच,आसवंद,पातुरडा खुर्द,पातुरडा बु,कुंडेगावं गावे वगळन्यात आली हे सर्व करत आसताना मंडळ अधिकारी व तलाठी यांनी हलगर्जी पणा केला त्या मुळे या यादीतून वगळण्यात आले त्या मुळे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले त्या मुळे पातूरडा सर्कल त्या निष्क्रिय अधिकारी वर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी शेतकरी याना सोबत घेऊन आपल्या जिल्हाधिकारी च्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी प्रशासन ची राहील निवेदनवर संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाजप लोकेश राठी,भारत वाघ, रामदास म्हसाळ, गोपाल वाकडे,अविनाश धर्माळ, दत्ता डिक्कर,संजय मेंहगे,सुनिल मेंहगे,पराग घोराड, विठ्ठल वानखडे, रामदास ठाकरे ऊकर्डा कुरवाळे, नारायण अवचार या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते