अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या गणेश वर नियतीचा घाला !! मित्रत्व जपणाऱ्या गणेश चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ! …माळीपेठ वर दुःखाचा डोंगर .

0
896

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

असे म्हणतात एका शायरने असे म्हटले आहे की ‘जिंदगी का क्या भरोसा कब मौत आ जाये ,,हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते है जो औरो के काम आ जाये !!,,
या म्हणीप्रमाणे साखर खेर्डा येथील माळी पेठ येथे राहणारा,मृदू स्वभावाचा व नेहमीच मित्रत्वाचं नातं जपणारा ‘लोकांच्या सुखदुःखात एका आवाजावर धावून जाणारा ‘गणेश केशव बेंडमाळी वय 30 वर्ष अचानक नियतीने घाला घातल्यामुळे सर्वांना सोडून कायमचा निघून गेला ! ..सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माळी पेठ येथे राहणारा,गणेश बेंडमाळी हा 30 वर्षीय तरुण ‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगूनसाखरखेर्डा येथे ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये क्लासेस लावून स्पर्धा परीक्षेची तयारी गणेश करू लागला . ‘शिवाय पोलीस भरती किंवा सैनिक भरती मध्ये जाऊन देशाची सेवा करावी म्हणून तो व्यायाम करण्यासाठी सकाळी पाच वाजता धावायला जायचा ‘माळी पेठ एवढेच नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये गणेशचा मित्र वर्ग खूप होता ‘अतिशय शांत व मृदू स्वभावाचे गणेश मित्रत्वाचं नाती जपणारा होता ‘एखाद्या मित्राने जर म्हटले की गणेश माझ्या भावाचं लग्न आहे ‘ मुलीचं लग्न आहे तर गणेश सकाळीच उठून त्याला मदत करण्यासाठी जायचा व शेवटपर्यंत कामे करू लागत असे .शिवाय गणेश ने नुकतेच आरोग्य विभागाचा औरंगाबाद येथे पेपर सुद्धा दिला होता ’14 मार्च च्या सायंकाळी
मजबूत शरीरयष्टीचा गणेश च्या छातीमध्ये अचानकपणे रात्रीला दुखू लागल्यामुळे त्याला ताबडतोब घरच्यांनी चिखली येथील दवाखान्यांमध्ये हलवले .मात्र नियतीच्या मनात वेगळेच काही होते ‘व नियतीने गणेश हा हिरावून नेला व गणेश चे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री साडेअकराच्या दरम्यान निधन झाले ‘गणेश च्या मृत्यूची बातमी साखरखेर्डा येथे धडकताच ‘संपूर्ण माळी पेठ व मित्र परिवाराच्या डोळ्यातून अश्रू तरळले .गणेश आपल्याला सोडून गेला यावर कोणाचाही विश्वास बसेना ‘मित्रत्वाचं नातं जपणारा लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा .व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा गणेश ला मात्र काळाने हिरावून नेले ‘गेल्या दीड ते दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया राज्यात राबवली नसल्यामुळे ‘अनेक स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे तरुण तरुणी दडपणाखाली खाली जीवन जगत आहेत ‘तान तनाव त्यांच्या डोक्यावर येत आहेत ‘म्हणून शासनाने सुद्धा लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे ।गणेश गेल्यानंतर गणेश च्या आठवणी सांगत असताना ‘त्याचे जीवाभावाचे मित्र असलेले ‘गणेश जाधव नारायण अवचार ‘बंडू बंडू माळी ‘यांचे डोळ्यातून अश्रूंच्या धारा मात्र वाहत होत्या !यावरून गणेश हा सर्वांच्या आवडीचा होता यात तिळमात्र शंका नाही !गणेश ला भावपूर्ण श्रद्धांजली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here