गोंदिया-शैलेश राजनकर
जि.प.गोंदिया अंतर्गत अनुकंपा पदभरती संदर्भात कागदपत्रासह अनुकंपाधारकाना दि.10 मार्च ला बोलाविले आहे. तत्सम 4 मार्च ला पत्र व्यवहार केल्याचे सागीतले जात आहे पण पडताळणी दिवस उजाडला तरी निम्म्यापेक्षा अधिक अनुकंपाधारकाना तो पत्र च प्राप्त झाला नाही याला जबाबदार कोण?
त्यातही वेगवेगळ्या संमतीपत्राची मागणी केलेली आहे.
आता निरपराध अनुकंपाधारकाना असा प्रश्न पडला की एवढ्या शुल्लक वेळेत कागदपत्रे तयार करायची तर कशी?
गेल्या वर्ष भर कोविड-19,
नंतर अधिकार्याच्या बदल्या,
नंतर ग्राम पंचायत निवडणुक अशा वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी ना समोरे जाऊन कसातरी पद भरती चा मुहूर्त निघाला.
पण ते पदभरती नसुन निव्वळ कागदपत्रे पडताळणी होती.
त्यातही सर्वाना पत्र न मिळाल्याने अनुकंपाधारकाची त्रेधातिरपीट उडाली.
कित्येक सदस्यानी जसी तसी माहीती गोळा केली व जि.प. ला आपल्या अपूर्ण कागदपत्रासह पोचले.
कित्येक सदस्याना घरून फोन येत होते की तुमचा पत्र आला आहे.
अशा कित्येक समस्याना सामोरे जावे लागत आहे.
चिचगड,सालेकसा व जिल्ह्याबाहेरिल अतीदुर्गम भागात वास्तव्यास असणार्या लाभार्याना योग्य वेळेवर पत्र न मिळाल्याने ते या कार्यवाहीस मुकणार तर नाही असा प्रश्न उद्भवत आहे.
गेल्या वर्षभरा पासुन पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती पण भरतीला उशिर होणे या दरम्यान च्या काळात काही विशिष्ट दलालानी पात्र सदस्यासी संपर्क करून त्याच्यासी पैशाची लेनदेन करत आहेत. तत्सम पुरावा असल्याचे क्लीप असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेचे पदाधिकार्यानी केला आहे.
या समोरची प्रक्रिया पारदर्शक रित्या व रितसर पत्र व्यवहाराने व्हावी जेणेकरून चारही बाजुने होरपळलेल्या अनुकंपाधारकाना दिलासा मिळेल असी अपेक्षा आहे अन्यथा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याचा ईशारा अनुकंपाधारक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय हत्तीमारे, मंगेश मोहतुरे, ज्योती नानेट यानी केला आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


