अमरावती जिल्हातील गरीब गरजू अपंगांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दया

0
340

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अपंग जनता दल सामाजिक संघटना ची मागणी

अमरावती : देशातील गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत या योजनेतून संरक्षण कवच मिळावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेला प्रारंभ केला होता . या योजनेला गती मिळताना दिसत आहे . गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ देण्यात येणार येत आहे . या वर्षी सुद्या पुन्हा ही योजना सुरु केली असून या योजनेत लाभार्थी ठरलेत त्यांना गोल्ड विमा कार्ड बनवून देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे . या योजनेतून लाभार्थीना वर्षाला ५ लाखापर्यंत मोफत उपचार , खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळणार आहे अनेक गरीब गरजू अपंगांनी आयुष्य मान भारत योजनेचा याद्या मध्ये नाव नसल्याने त्यांना स्मार्ट कार्ड बनविले नाही म्हणून त्यांना या योजनेचा लाभ मिडत नाही आहे आशा अमरावती जिल्हातील गरीब गरजू अपंगांना या योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी अपंग जनता दल चे अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here