किनगावात तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक करीत ३८ जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा

0
2113

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चाल काने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किशान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या व तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयातील लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तीन वर्षापासुन तहसिल कार्यालयात त्यांच्या कडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुशंगाने ते मागील दोन वर्षापासुन पि.एम.किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत. सदर योजनेत शेतकऱ्यांचे नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्र.असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पि.एम. किशानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांच्या आदेशाने करत होते. मात्र दिनांक १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेचं उपलब्ध् व्हायचे म्हणुन ते देखील बंद होते दरम्यान दिनांक १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पिएम किशान संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शना आले व त्यांनी या बाबत थेट तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली तेव्हा तहसिलदारांच्या लॉगीन आय-डी या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून ललित नारायण वाघ रा.किनगाव ता.यावल यांना कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.
आधी पण नोंदी केल्याचा संशय.
पैसे घेवुन पि.एम.किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या म्हणुन आपण आपल्याचे कर्मचाऱ्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सुचना केल्या तेव्हा ३८ नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगीतंले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसुल प्रशासन बदनाम होते.असे तहसिलदार महेश पवार यांनी सांगीतले- आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here