यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
मागील दोन वर्षांन पासून संपुर्ण देशात कोरोना संसर्गाच्या या भयंकर महामारीमुळे शेती व उद्योग व्यवसायांवर मोठे विपरीत परिणाम झाले असुन , यामुळे सर्वसामान्या पासुन तर अन्नदाता शेतकरी बांधवांवर ही कठीण वेळ आलेली आहे. यातच शेतीला तर निसर्गाने ही मोठी हानी पोहचवली असुन यावर्षी शेतीला लावलेला खर्चही निघने कठीन झाले आहे आणी अशा परीस्थीतीत जर शेतकऱ्यांच्या शेतातून ८ दिवसात दोन वेळा विजपंपाच्या केबल वायरींची चोरी झाली तर त्या शेतकऱ्यांची परीस्थीती काय होईल असाच एक प्रकार किनगाव येथील शेतकरी संदीप चुडामण पाटील,सिताराम महाजन,चंदू टेलर व किनगांव बुद्रूक ग्रा.प.मालकीचे मोटकरे शेत
यांच्या बाबतीत घडला संदीप पाटील यांचे गट नं.१३ सह सिताराम महाजन,चंदू टेलर व ग्रा.प.चे मोटकरे शेत यांचे चुंचाळे रस्त्यावर शेत आहेत गेल्या आठवड्यात यांच्या शेतातून अंदाजीत २० हजार रूपये किंमतीची विजपंपाची केबलवायरी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या मात्र बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वरील सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नवीन २० हजार रूपयांच्या वायरी आणल्या व त्या लावून शेतीपिकांना पाणी देण्यास सुरूवात केली मात्र दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुंन्हा या केबल वायरी चोरून नेल्या आधीच शेतीत पुरेसे उत्पंन्न येईल कीनाही याची खात्री नसतांना आठ दिवसात जर दोनवेळा केबल वायरींची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्या शिवाय राहणार नाही किनगावसह परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन चोरांना पोलिसांचा धाक वाटत नाही की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी दिवसरात्र शेतीत मेहनत करून एक एक रूपया जमा करतो आणी चोर मात्र हजारो रूपयांच्या शेतीपंपाच्या केबल वायरी चोरून नेतात म्हणून किनगावसह परीसरातील या भुरट्या चोरांनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त राबवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.