केन्द्रातील मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या घरगुती गॅस, इंधनच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने केले आंदोलन

0
346

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

देशातील नरेन्द्र मोदीची सरकार ही जनतेच्या विरोधी कार्य करीत असुन सातत्याने भरमसाठ वाढ होत असलेल्या जिवनावश्यक वस्तु तसेच घरगुती गॅस सिलेंडर , पॅट्रोल , डिझेल च्या वाढत्या किमतीमुळे देशातील सर्वसामान्य माणसांचे आर्थीक बजट बिघडवले असल्याने नागरीकांनी जगावं की मरावं या प्रश्नावर आता सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार मानिष जैन यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला, राष्ट्रवादीच्या वतीने राज्यात केन्द्र सरकाराविरुद्ध आंदोलन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे . आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गांजला आहे. सर्वसामान्य माणसाच्या घरातील स्वंयपाक होणारे एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे. या देशातील सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीन झाले असून , कोरोना सारख्या महामारीमुळे संपुर्ण हा आर्थीक व मानसिक संकटात ओढवला गेला असुन , आपण जगावे कसे असे प्रश्न जनतेसमोर उभा राहीला आहे असे यावलचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील केन्द्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य व्याक्ती ज्यांचे मासिक उत्पन्न कसंबसं सहा ते १० हजार रुपयांच्या आसपास आहे त्या देशातल्या सर्वसामान्यांच्या घराचा इंधनाचा खर्च मोदींनी दीड हजार रुपयांचा करून ठेवला आहे. पण केंद्र सरकारने काहीच उपाययोजना केली नाही. केवळ निवडणुकीपुरतंच गिमिक करायचं त्या त्या राज्यात निवडणुका लागल्या की इंधर दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य माणसांना वाऱ्यावर सोडायचं हा भाजपाचा अजेंडा आहे.
१०६ रुपयांच्या पुढे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर गेले. डिझेलही शंभरचा पल्ला गाठत आहे. त्यात आता स्वैपाकाचा गॅसही वाढला. पेट्रोलच्या सेंच्युरीच्या विनोदाचे केंद्र सरकारला फारसे वावडे उरलेले नाही. त्यांची कातडी निबर झाली आहे. मात्र सर्वसामान्य माणसाच्या तोंडचं अनही आता मोदीजी हिरावून घेऊ पाहात आहेत. हेच का त्यांचे अच्छे दिन असे म्हणत आज केंद्रात सत्ता असलेले भाजपाचे लोक एकेकाळी इंधन दरवाढीवरून आकाश पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे. आता त्या कालखंडाच्या दुप्पट-तिप्पट इंधनाचे दर झालेत. परंतु केंद्र सरकार दरांचं नियमन करायला तयार नाही. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडलं तरी चालेल अशी या मोदी सरकारची भूमिका आहे
इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. सध्या गेल्या दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा मिळवायचा याचा एक ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही. पण आपण आता गप्प बसून चालणार नाही. तुमचा सिलिंडर आमच्या घराच्या सुख-शांतीला आग लावत असेल तर आंदोलन छेडण्याशिवाय तुम्ही आमच्यासमोर पर्यायच ठेवला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड निर्बंधाचे सगळे विहित नियम पालन करुन यावल शहरातील भुसावळ टी पाँईट वर दिनांक ५ जुलै सोमवार रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले . यावेळी माजी आमदार मनिष जैन , राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ,युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील ,फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना एस पी बोदडे , गिरधर पाटील , राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम बी तडवी सर , माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते , जी पी पाटील सर , यावल शहराध्यक्ष करीम मन्यार , युवकचे फैजपुरचे शहराध्यक्ष विनोद कोल्हे , युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे , कामराज घारू ,सहदेव पाटील , दिपक नागो पाटील ,ललीत तेली , किशोर माळी , अॅड रियाज पटेल , व्दारकाबाई पाटील , शामल सतिष भावसार , प्रशांत पाटील , चंद्रकांत पाचपोळे, विनोद कोल्हे , रोहन महाजन , राजेश करांडे, अशोक भालेराव, अमोल दुसाने आदीनी या आंदोलनात भाग घेतला . यावेळी यावलचे नायब तहसीलदार आर डी पाटील यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here