अजहर पठाण
सेलू/परभणी
श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू गाने* *निवेदनात म्हटले आहे की प्रशासनाच्या वतीने कोरोणाच्या RTPCR चाचण्या करण्यात येत आहेत. त्याच्या रिपोर्ट हा 8-10 दिवस लागत आहेत. मागील 15 दिवसाआधी सेलूतील* *व्यापाऱ्यांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्या होत्या. जवळपास 1000 च्या वर व्यापाऱ्यांनी या चाचण्या केल्या होत्या. पण या RTPCR** *चाचण्याचे रिपोर्ट तब्बल 10 दिवसांनी आले. व यात शेकडो व्यापारी कोरोणा बाधीत आले
*RTPCR चाचणी केल्यानंतर* *त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते. पण तसे करण्यात आले नाही. त्यामुळे हे शेकडो कोरोणा बाधीत व्यापारी अगोदर त्यांच्या घरच्या लोकांच्या व नंतर बाहेरच्या हजारो* *लोकांच्या संपर्कात आले. व हे व्यापारी कोरोणा चे वाहक ठरले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या घरचे व संपर्कातील लोक कोरोणा बाधीत आले आहेत. केवळ RTPCR चाचण्याचे रिपोर्ट उशिरा आल्यामुळे हे घडत आहे. यास कोण जबाबदार आहे? तरी यानंतर ज्यापण RTPCR चाचण्या होतील त्याचे रिपोर्ट लवकरात लवकर देण्यात यावे. जेणेकरून असे पुन्हा घडणार नाही. व ज्यांची RTPCR चाचणी केली आहे त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. जेणेकरून कोरोणाचे रुग्ण वाढणार नाहीत. असे निवेदनात म्हटले आहे
या निवेदनावर जयसिंग शेळके, हर्षल देशमुख, पांडुरंग सावंत, अक्षय सोळंके, पवण धूमाळ, गणेश शेवाळे यांच्या सह्य़ा आहेत