नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
कोरोणाच्यां महाभयंकर लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. यामधे आपला बुलडाणा जिल्हा कोरोना हॉट स्पॉट म्हणून घोषित झाला आहे. आपल्या नांदुरा तालुक्यात हा आकडा वाढता असल्यामुळे याला आळा घालण्यासाठी असलेल्या उपाययोजना कमी पडत आहेत. अशातच कोरोणावर मात करण्यासाठी भारताने जी लस संशोधनानंतर उपलब्ध करून दिली त्यासाठी लाखो लोक प्रतीक्षेत आहेत. परंतु आपले लसीकरण केंद्र मर्यादित असल्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी २-२ महिने लोकांना वाट बघावी लागत आहे. यामुळे जनतेत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. करिता आपण हे लसीकरण केंद्र वाढवून नांदुरा शहर व तालुक्यातील प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना दिलासा द्यावा या संदर्भाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी तहसीलदार साहेब यांना दिले. यावेळी पत्रकार प्रफुल्ल बिचारे,सुमित धांडे व कापडे उपस्थित होते.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


