घरकुल योजनेबाबत महाराष्ट्र सरकार सुस्त-योजनेचे लाभार्थी मात्र त्रस्त-

0
750

 

उषा पानसरे  कार्यकारी सपादीका मो. 9921400542

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा लोकसभेत घणाघात*

 

खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी लोकसभेत पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले, मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे 2022 पर्यंत प्रत्येकाला निवारा-हक्काचे घरकुल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून,गेल्या 3 वर्षापासुन राज्य सरकारने आपल्या हीश्याची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याची रक्कम अदा न केल्याने लाखो लाभार्थी या योजनेपासून वंचित,अनुदान न मिळाल्याने अनेकांची बांधकामे अर्धवट व अनेकांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे,उदासीनपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणे आवश्यक,घरकुल योजनेची मुदत 2022 ऐवजी 2025 अशी वाढवून द्यावी:खासदार सौ नवनीत रवी राणा यांची लोकसभेत मागणी*
8 अ किंवा पीआर कार्ड न मिळाल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित
*संसदेचे हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू झाले असून आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अमरावती च्या कर्तव्यदक्ष खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी लाखो लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न लोकसभेत उचलून धरला.आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असते, जे गोरगरीब लोक घर बांधू शकत नाहीत त्या लोकांसाठी केंद्र सरकारने *पंतप्रधानआवास योजना* सुरू केली असून 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळावे *हे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्नं आहे* परंतु महाराष्ट्र सरकारने गेल्या 3 वर्षापासून आपल्या हीश्याची रक्कम लाभार्थींना न दिल्याने अनेकांची बांधकामे रखडली असून,अनेक नागरिकांची घरे अर्धवट स्थितीत असल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे,त्यामुळे राज्यसरकारने आपला हिस्सा लवकरात लवकर देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश द्यावे अशी आग्रही मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी लोकसभेत केली.
*ग्रामीण भागात नमुना 8 (अ) व शहरी भागात पीआर कार्ड ही या योजनेची मुख्य अट असून अनेक नागरिकांना वर्षानुवर्षे या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ताटकळत बसावे लागते त्यामुळे ही कागदपत्रे 15 दिवसाचे आत मिळतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा यावेळी खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी केली*
*खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी सभागृहात हा अत्यंत महत्वाचा प्रश्न पोटतिडकीने व प्रभावीपणे उपस्थित केल्यामुळे आता घरकुल च्या लाभार्थ्यांना व वंचित नागरिकांना न्याय मिळून त्यांचे स्वतःचे हक्काचे घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्याची खात्री लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here