सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे जिथे माणसे आहे हैराण आहेत तेथे पशू पक्षी प्राणी कसे बर मागे राहतील .
असेच पाण्याच्या शोधात तीन नीलगाई एका विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना दिनांक21 एप्रिल रोजी घडली
हकिकत अशी कि .
साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी शिवारात एका विहीरीत पडलेल्या तीन निलगायीचे प्राण ग्रामस्थांनी वाचविले आहेत .
तांदुळवाडी शिवारात तुळशिराम गोपाळा जाधव यांच्या शेतातील विहीर रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेल्या तीन निलगायी पडल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली . सरपंच अंबादास बुंधे यांनी तातडीने घटणास्थळावर जावून उपरोक्त घटणेची माहीती साखरखेर्डा पोलीस स्टैशनला दिली . ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी वनविभागाला माहिती दिली . परंतू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी केली . त्या निलगायी जिवंत असल्याने त्यांचे प्राण वाचविणे महत्वाचे असल्याने सरपंच अंबादास बुंधे यांनी ठाणेदाराची परवानगी घेवून रामेश्वर बुंधे , मदन बुंधे , मदन पिसे , सौ . मंदा बुंधे , संदीप राऊत , ऋषिकेश बुंधे , रघुनाथ बुंधे , भुजंग दवडेकर यांच्या मदतीने दोर बांधून तीनही निलगायीचे प्राण वाचविले .
शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी ह्या निलगायी करतात . परंतू मानवतावादी दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांनी या तीनही जंगली प्राण्यांचे प्राण वाचवून आपले कर्तव्य बजावले .




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


