निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी
नगरसेवक नितीन जाधव,नाना जाधव आणि बापू जाधव यांच्या मातोश्रींचे सोमवारी निधन झाले या अनुषंगाने अंजुम ताई सुहास कांदे यांनी या कुटुंबास सांत्वनपर भेट दिली.
या प्रसंगी चांडक प्लॉट परिसरातील महिलांनी अंजुम ताईंची भेट घेतली,पूरग्रस्त परिस्थितीने झालेली वाताहत आणि होत असलेल्या अडचणीं त्यांनी मांडल्या,आमदार सुहास कांदे यांच्यावर आमचा विश्वास आहे म्हणून च आम्ही एक महिला म्हणून आपल्याकडे आमच्या अडचणी मांडत आहोत आपण आमच्या अडचणी समजून घ्या आणि आपण त्या सोडवाल अशी अपेक्षा केली. आमदार सतत आपल्यासाठी काम करत आहेत,कायमस्वरूपी आपल्या अडचणी दूर होतील या साठी ते प्रयत्न करत आहे,शिवाय तातपुरत्या शहरात येण्या जाण्याची महत्वाची अडचण स्वखर्चातून त्वरित दूर करण्यात येतील, शासनाकडून मंजूर निधी आली की त्वरित ईतर कामही सुरू होईल असा अंजुमताईंनी महिलांना धीर दिला . या वेळी शिवसेना शहराध्यक्ष सुनील जाधव,संगीता बागुल,उज्वला ताई खाडे,लीला राऊत,सरला घोगले, नगरसेवक नितीन जाधव व ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते.