नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंनदिवस वाढत आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठित न झाल्यामुळे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी सादर केले अर्ज प्रलंबीत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जावर आपल्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठित करण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता असते परंतु सध्या महाराष्ट्र राज्य सह बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोना महामारीची अत्यंत दयनीय परिस्थिती असून रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे परिणामी राज्य शासनाने ग्रामसभा आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहे.त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणेबाबत शेतकऱ्यांनी सादर केलेले अर्ज यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या योजनेपासून माझा पात्र शेतकरी बांधव वंचित आहे हीच बाब लक्षात घेता, मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी राज्याचे कृषिमंत्रीमा.ना.श्री.दादाजी भुसे,राज्यमंत्री डॉ.विश्वजीतजी कदम, कृषी विभागाचे प्रधान सचिव मा.एकनाथजी डवले,मा.प्रकल्प संचालक,नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना याना या योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यास परवानगी मिळणेबाबत दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी ई-मेल द्वारे निवेदन सादर केले होते राज्याचे कृषिमंत्री मा.ना.
श्री.दादाजी भुसे यांनी सदर बाबत तात्काळ दखल घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यासा करण्यासाठी प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता ऑनलाइन पध्दतीने ग्राम सभा घेण्यास परवानगी दिली असून त्याबाबत त्यांनी विभागाला सूचना केल्या व कृषी विभागाने आमदार श्री. राजेश एकडे यांनी ईमेल केल्यानंतर तात्काळ पत्र क्रमांक व्हीपीएम -२०२१/प्र.क्र.३१२/पंरा-३ दिनांक २८ एप्रिल २०२१ अन्वये अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर बाबत ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गाव पातळी वरील ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यास परवानगी दिली आहे .त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांना या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे तसेच सदर योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत बीज उत्पादन कार्यक्रम सुद्धा सुरू करणे बाबत ग्रामसभेचा ठराव ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणार असल्याने त्याचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मलकापुर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री.राजेश एकडे यांनी शासना कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व आमदार श्री राजेश एकडे यांचे शेतकरी बांधवांच्या वतीने अभिनंदन होत आहे.