पाणी टँकर वाटप वरून भाजप नगराध्यक्ष करत आहे पक्षपात नगरसेविका सौ.सीमा मेश्राम यांचा आरोप ?

0
242

 

सचिन वाघे वर्धा
17.5.21
हिंगणघाट :- प्रभाग क्रमांक 6 ( अ ) या भागातील परिसरातील भीषण पाणी टंचाई पाण्याच्या टँकरची मागणी बद्दल वारंवार नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना सांगून सुद्धा कोणतेही सहकार्य केले नाही प्रज्ञा नगर, आदर्श नगर ,संत कृपा नगर ,साई नगर ,निखाडे भवन, गजानन नगर, या भागात भीषण पाणी टंचाई असून विहीर आटले आहेत येथील नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागते या भागात नळ कनेक्शन जोडलेले नाही नगरपालिके द्वारे टॅंकरने पाणीपुरवठा होत नाही नगराध्यक्षांचे म्हणण्यानुसार कोरोना असल्याने एसडीएम यांच्या आदेशाने त्यामुळे पाणी देता येत नाही अशा परिस्थितीत येथील नागरिकांनी जगावे तरी कसे ? या बाबतीत जातीने लक्ष देऊन नळ कनेक्शन सुरू करावे किंवा टॅंकरने या भागात पाणीपुरवठा करावा जेणेकरून या उन्हाळ्यात नागरिकांना जीवन जगणे सुसह्य होईल सौ सीमा श्रीकृष्ण मेश्राम(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका) यांनी मा.मुख्याधिकारी यांना पत्र तसेच जनतेच्या समस्या विषयी नगर अध्यक्षाचा पक्षपात निदर्शनास आणून दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here