पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा,अन्यथा ठिय्या आंदोलन- लोकनेते विजयराज शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

0
500

 

अजहर शाह मोताळा

खरीप हंगाम 2020-21 मधील जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकविम्या पासून वंचित

“विमा कंपनीची मनमानी खपवुन घेतली जाणार नाही”

*बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 मधील खरीप हंगामातील हजारो शेतकरी हे पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने अश्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी या मागणी साठी आज लोकनेते विजययराज शिंदे यांनी तसेच किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

“यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान “विमा कंपनीची मनमानी सुरु असून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसून कृषि विभाग व या विमा कंपनीचे आर्थिक हित संबंध असल्याचा सुद्धा घनाघाती आरोप यावेळी भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केला आहे.पिक विम्या बाबत शेतकऱ्यांच्या येणाऱ्या विविध तक्रारिंवर कृषि विभाग कोणतीही कारवाई न करता केराची टोपली दाखवत असून यामुळे शेतकरी मेटाकुटिस आला आहे.जिल्हाधिकारी यांनी 50 पैसे पेक्षा आणेवारी कमी असल्याचे जाहिर करून सुद्धा जर विमा कंपन्या या घोषणेला जुमानत नसतील तर अश्या विमा कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी दिला आहे.”

दिलेल्या निवेदनात नुमद आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 या मागील वर्षात खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तिमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.महसूल यंत्रनेने पंचनामे करून त्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्याची आणेवारी घोषित केली होती. त्यात सर्व तालुक्याची आणेवारी ही 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे अश्या कोणत्याही शेतकऱ्यास पिक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत पिक विमा कंपनीने खात्यात जमा केलेली नाही.

30/12/ 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे खरीप हंगाम 2020-21 ची तालुका निहाय अंतिम आणेवारी घोषित केली होती. सदर घोषित केलेल्या आणेवारीत बुलडाणा तालुक्यातील 98 गावे तर मोताळा तालुक्यातील 120 गावांची अंतिम आनेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे.
संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता जवळपास 1419 गावांची आनेवारी 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली आहे.विमा कंपनीच्या म्हणन्या नुसार शेतकऱ्यांनी शेतकरयांनी नुकसान झालेल्या पिकांचा क्लेम नुकसान झाल्या नंतर 72 तासाच्या आत ऑनलाइन दाखल करावा अशी अट घातली होती .बऱ्याच शेतकरयांनी यानुसार क्लेम दाखल केला आणि काही शेतकरयांना 72 तासाच्या आत क्लेम दाखल करता आला नाही शेतकरयांच्या जवळ महागड़े मोबाइल, नेट सुविधा,अज्ञान या सर्व कारनामुळे काही शेतकऱ्यांना नुकसानीचा क्लेम दाखल करता आला नाही. त्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास नकार देत आहे.प्रशासकिय महसूल यंत्रनेनी स्वतः स्थळ निरीक्षण करून पंचनामे करून या नुकसानीचा सर्वे केलेला आहे.त्या अहवाला च्या आधारेच जिल्हाधिकारी यांनी आनेवारी जाहिर केलेली आहे.त्या आधारे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे ही बाब सुस्पष्ठ असताना विमा कंपन्या आर्थिक नुकसान भरपाई टाळा टाळ करत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या आनेवारी व गावातील तलाठी वा महसूल यंत्रनेनी केलेल्या पंचनाम्या च्या आधारे संपूर्ण जिल्ह्या भरातिल पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तत्त्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी व विमा कंपनीला द्याव्यात.
व येणाऱ्या 8 दिवसात जर जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम न मिळाल्यास अश्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्या च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्वी विमा कंपनी व जिल्ह्या प्रशासन जबाबदार राहिल, असा आंदोलनात्मक इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
यावेळी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे यांची उपस्थिति होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here