भगतसिंह जगुन बघा जीवनाचं सोनं झाल्यासारखे वाटेल -अभयसिंह

0
360

 

२३ व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारे भगतसिंह,बालपणात काही वर्षाचे असतांना जालियनवाला हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या भरातवासीयांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचे रक्त एका बाटलीत भरून आणणारे भगतसिंह,मानवतावाद निर्माण करणारे भगतसिंह,इंग्रजा विरोधात लढता लढता या देशातील आस्तिक वादाला नाकारून पुरोगामी नास्तिकवादाची मुहूर्त मेढ रुजवणारे भगतसिंह आणि आज त्यांच नाव घेणारे आपण खरच त्यांच्या नाव घ्यायच्या लायकीचे आहोत का? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा?
मित्रांनो भगतसिंह यांच्या बलिदानाचा फार फायदा झाला असे मला बिलकुलच वाटत नाही.कारण तसे असते तर आज या देशात मोठ्या प्रमाणात अराजकता माजलेली नसती. देशासाठी फासावर जाणाऱ्या भगतसिंह यांची देशभक्ती कुठे आणि याच देशात राहून निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून खोटं बोलून देश विकण्या पर्यंत धाडस करणारे काही राजकीय पदाधिकारी कुठे,आपल्या भारतवासी बांधवांसाठी स्वतःचा धर्म बाजूला ठेवणारे भगतसिंह कोठे आणि दुसऱ्याच्या धर्माला कनिष्ठ ठरवत वेगवेगळ्या धर्मात धार्मिक वाद निर्माण करणारे कुठे, आझादीही मेरी दुल्हन हैं । म्हणणारे भगतसिंह कोठे आणि याच आझाद भारतात युवती व स्त्रियांवर बलात्कार करणारे कुठे ,अगर इस देश को सुधारणा हैं तो नौजवान कॊ राजनीती मे आना चाहीये। असे म्हणणारे भगतसिंह कोठे आणि आणि रामराहिमच्या आसाराम रामपाल यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सुध्दा त्यांचे समर्थन करणारे तरुण कोठे, भारताचा विकास व्हावा आणि हा विकास भारत स्वतंत्र झल्याशिवाय शक्य नाही म्हणुन राजकारण बाजूला ठेवून प्रामाणिक पणे लाला लजपतराय यांच्याशी समजूतदार पणा दाखवणारे भगतसिंह कोठे आणि सत्ता भोगणारे प्रचंड खोटं बोलणारे सत्ताधारी व त्यांचा विरोध खंबीरपणे न करता येणारे इतर विरोधी बाकावर बसणारे कोठे,अरे स्वतःचा धर्म लाथाडून ( पगडी आणि केस व दाढी करून) इतिहास रचणारे भगतसिंह कोठे आणि आमच्या प्रत्येकाच्या गावात आणि शहरात आपल्या विविध धर्माच्या स्मशान भुम्या बांधण्यासाठी आग्रही असणारे आपण कुठे, बहिऱ्या सरकारला जाग यावा म्हणून ब्रिटिश असेंबलीत बॉंम्ब स्फोट करणारे भगतसिंह कोठे आणि आणि सरकारचे चुकीचे निर्णय,बंधने,कायदे मुकाट पणे सहन करणारे आपण कोठे, मी नास्तिक का झालो?,हे पुस्तक लिहून पुरोगामी विचारसरणी निर्माण करणारे भगतसिंह कोठे आणि प्रचंड अंधश्रद्धा पाळणारे आपण कोठे.

मित्रांनो अशी हजार उदाहरणे देता येतील भगतसिंह यांच्या देशभक्ती ची आणि आपण याला १००% विरोधाभासाचे जीवन जगत आहोत.देश भक्ती ही देशावर आलेल्या संकटाच्या वेळी वापरणं शिका ना की आपल्याच स्वकीयांच्या जाती पातीच्या माणसाचं भले करण्या साठी.
भावांनो आपण भगतसिंह यांचे एवढे जरी विचार अंगीसात केले तरी आपण हा देश दंगल मुक्त,भ्रष्टाचार मुक्त,अंधश्रद्धा मुक्त,आणि गरिबी मुक्त उभा करू शकतो आणि एवढीच आपल्या तरुण मित्रांकडून भगतसिंह जयंती निमित्त अपेक्षा.

*इन्कलाब जिंदाबाद*

*अभयसिंह*
९४२३७६१९०८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here