यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील बोराळे येथील युवा सामाजिक कार्यकर्त सुपडु संदानशिव यांची भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य(सचिव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सुपडू संदानशिव यांचा ग्रामीण आणी आदीवासी क्षेत्रातील सर्वसामान्यात व्यक्तिपर्यंत वाढलेला दांडगा जनसंपर्क या दृष्टीकोणातुन जळगांव जिल्ह्यातील राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे,महा सचिव श्रीकांत वानखेडे व संघटक विक्रम प्रधान यांच्या साथीचे काम पाहून संघटनेचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य (सचिव) म्हणून जबाबदारी सोपवली असल्याने त्यांची तळमळ बघून संघटनेला गती मिळणार आहे.
भीम आर्मी जळगांव जिल्हा युनिट मधील समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा आक्रमक चेहरा असलेले सुपडू संदानशिव हे संस्थापक अध्यक्ष ॲड .चंद्रशेखर आझाद रावण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
संघटनेच्या अनेक शाखा संदानशिव यांनी उघडलेल्या असून महाराष्ट्र राज्य मध्ये भीम आर्मी जोमाने वाढविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन शिंग, प्रभारी दत्तू मेढे,महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.प्रफुल जी शेंडे यांनी सुपडू संदानशिव यांना निवडीचे पत्र दिलेले आहे,त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसिद्धी प्रमुख राजेश गवळी यांनी सुद्धा प्रसिद्धी द्वारे कळवले आहे. सुपडु संदानशिव यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे .