भीम आर्मी ने दिले प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन,आरोपींना कठोर शिक्षेची मागणी व फास्टट्रॅक वरती खटला चालवण्याची केली मागणी

0
617

 

यावल ता (प्रतिनिधी)विकी वानखेडे

फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयास दिले भीम आर्मी ने निवेदन,
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
हत्याग्रस्त पिडीत विवाहितेला योग्य तो न्याय मिळावा.
यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेरवाशीण असलेली अल्पवयीन तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा जळगांव येथील दांडेकर नगरातील सागर निकम या तरुणाशी ११ जुलै रोजी विवाह सोहळा संपन्न झाला,मात्र लग्न सोहळ्याच्या दहा दिवसातच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली…..
त्यांनी अजुन म्हटले आहे की, सदर पीडित तरुणी हि अल्पवयीन असल्याने ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसतांना हि तिचा विवाह करण्यात जे कि भा.दं.स. च्या बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ विरुद्ध आहे..तसेच जळगांव येथील रहिवासी सागर निकम व त्यांचा परिवार यांनी पीडित तरुणी अल्पवयीन असून देखील कायद्याविरुद्ध जाऊन विवाह केला व सदर विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले,,,जे कि हत्या केल्या प्रमाणेच आहे.सदर घटना हि,हृदयाला खिन्न करणारी व मानवतावादी समाजाला काळिमा फासणारी आहे. सदर घटनेचे गंभीर्य बघता योग्य ती चौकशी करून हत्तेती सर्व आरोपींना कठोर शिक्षा कशी देता येईल याचा विचार करावा व सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा जेणेकरून भविष्यात असले कृत्य करणाऱ्या समाजविघातक कृत्यांना चपराक बसेल. सदर निवेदन देते वेळी
भीम आर्मी राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे,महासचिव प्रशांत तायडे, हिंगोना शाखा अध्यक्ष सत्यवान तायडे,कारखाना शाखा चे संतोष तायडे,जितू वाघ,संजय जाधव,दीपक अहिरे,ललित तायडे,गोविंदा भालेराव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here