यावल (प्रतिनिधी)निधी विकी वानखेडे
यावल : येथील तहसिल कार्यालयात मंगळवारी संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली समिती समोर १ हजार २६५ प्रकरण ठेवण्यात आले होते त्यातील ३१० प्रकरण मंजुर करण्यात आली आहे तर उवर्रित प्रकरणांची पडताळणी केल्या नंतर ते पुढील बैठकीत समिती समोर ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रकरणात त्रुट्या आढळल्या त्यांच्या त्रुट्यांची पुर्तता करण्याच्या सुचना समिती अध्यक्ष शेखर पाटील यांनी केल्या आहे.
मंगळवारी येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील होते या प्रसंगी समिती पुढे १ हजार २६५ प्रकरण ठेवण्यात आले होते या पैकी ३१० प्रकरण मंजुर करण्यात आले आहे. तर उवर्रित प्रकरणांची प्रशासकिय पातळीवर पडताळणी आणी छाणणी करण्याच्या सुचना आणी ज्या प्रकणारत त्रुट्या आढळून आल्या त्या प्रकरणातील संबधीत त्रुट्या दुर करण्या कामी अर्जदारांना सुचना करीत त्रुटयांची पुर्तता केली जावी अशा सुचना बैठकीत अध्यक्ष शेखर पाटील यांनी दिल्या आहे. बैठकीत समिती अध्यक्ष शेखर पाटील सह तहसिलदार महेश पवार, निवासी नायब तहसिलदार आर. के. पवार, संजय गांधी योजना समिती नायब तहसिलदार भाग्यश्री भुसावरे, इंगळे, आर. बी. मिस्तरी, योजना समितीचे मुन्ना पाटील, सदस्य सुभाष सोळुंके, सैय्यद जावेद अली, राजु तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, दिनकर पाटील, नितिन महाजन,संदिप सोनवणे, योगीता पाटील सह आदींची उपस्थिती होती