नांदुरा:- (प्रफुल्ल बिचारे पाटील)
सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पोलीस प्रशासन व पोलीस अधिकारी यांचे विषयी बघण्याची भूमिका ही फक्त एक भीतीयुक्त आदर असला तरी नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री सुरेश नाईकनवरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालत असतानाच आपल्यातील माणूस पण जागी करून मातृछत्र हरवलेल्या चार बालकांची आपल्या बालसुधार पथकाच्या माध्यमातून चार बालकांचा सांभाळ करण्याची व्यवस्था त्यांनी ३० मे रोजी बुलढाणा बाल सुधारगृह अधिकारी यांच्याकडे माहिती देऊन केली.
यावेळी मौजे नारायणपूर तालुका नांदुरा येथील मातृछत्र हरवलेल्या ४ बालकांना पालन पोषण हा प्रश्न पडला असतात, खाकी वर्दीतील देवमाणूस जागा होऊन नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री सुरेश नाईकनवरे यांनी बालसुधारगृह च्या माध्यमातून मातृछत्र हरवलेल्या ४ लहान लहान बालकांचा सांभाळ करण्याचा प्रश्न मिटवला. सदर केलेल्या कार्याबद्दल सर्वस्तरातून नांदुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री नाईकनवरे यांचे अभिनंदन होत आहे, सदर कार्याची दखल उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच वरिष्ठ यांनी घ्यावी अशी रास्त मागणी सर्व स्तरातून होत आहे.