सचिन वाघे वर्धा
दि.29 जुलै
हिंगणघाट डाॕ.बी.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा स्मृतिशेष मातोश्री शांताबाई जवादे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिक्षण संस्थेचे सचिव श्री.अनिल जवादे यांच्या प्रेरणेतून सेलू मुरपार परिसरातील शिवारात वृक्षलागवड संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनात साग,चंदन,बांबू,सिताफळ,करवंदअशा विविध प्रजातीच्या पाचशे वृक्षांची लागवड सुमारे दिडशे वृक्ष प्रेमिंच्या हस्ते करण्यात आली.
” वृक्ष हा सदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.वृक्ष लागवड,संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलातील त्याचे सकारात्मक कार्य आधोरेखित करण्यासाठी हे वृक्ष लागवड संमेलन आयोजित करण्यात आल्याचे” श्री.अनिल जवादे यांनी सांगितले.आज पृथ्वीची अवस्था वृक्ष तोडीमुळे बिकट होत चाललेली आहे.पृथ्वीवरील आॕक्सीजनचे प्रमाण कमी होत चालले आहे.वृक्ष हे मानवाला सर्वात जास्त आॕक्सीजन देण्याचे काम करीत असते.त्यामुळे माणसासाठी काही करावयाचे असेल तर आधी वृक्षांसाठी काही करावे लागेल. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकचळवळ होऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.प्रारंभी सकाळी नऊ वाजता डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालायात स्मृतीशेष मातोश्री शांताबाई जवादे यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा देऊन आदरांजली अर्पित केली.यावेळी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रशांत जवादे,सचिव श्री .अनिलभाऊ जवादे ,प्राचार्य एस.एम,राऊत,संस्थेचे संचालक सौ.मंदाताई जवादे,सौ.अनुराधा जवादे,पराग जवादे,रमन जवादे,श्री आर.के.पाटील,श्री.बी.एस.पाटील, प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे,प्रायमरीचे मुख्याध्यापक देवतळे सर,उपप्राचार्य गुडदे सर,श्री.इंगळे साहेब,पर्यक्षक दिनेश वाघ,सौ.बन्सोड मॕडम इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन ज्योत्सना धोटे यांनी तर आभारप्रदर्शन लाखे मॕडम यांनी केले.