(सूर्या मराठी न्युज ब्युरो)
वरवट बकाल येथील रहीवासी मोहनसिंग नथू डाबेराव वय.६३ वर्षे यांना उविभागीय अधिकारी देवकर यांनी 6महीण्यासाठि बुलडाणा जिल्ह्यातुन तडिपार केले होते,तो आदेश त्यांनी २७-११-२०२०रोजी पारीत केला,सदर आदेशाविरुध्द मोहणसिंग डाबेराव यांनी अँड.प्रमोद घाटे,अँड.थेरोकार,अँड.मेश्राम यांच्या मार्फत मा.विभागीय आयुक्त अमरावती यांच्या न्यायालयात प्र.हद्दपार/अपिल क्रमांक 94/2020/बुलडाणा,मोहणसिंग, वि.उपविभागीय अधिकारी *१ही अपिल दाखल केली सदर प्रकरणात केलेल्या युक्तिवाद योग्य माणुन मा.आयुक्त हरिष सिंह यांनी गै.अ.यांचे जबाब येईपावोतो ३०/१२/२०२० पर्यत स्थगिती दिली आहे.सदर तडिपारीचा आदेश हा पुर्णता राजकिय व अधिकारी यांच्या दबावामुळे पारीत झाला आहे असा सुरवातीपासुनच मोहणसिंग यांचे वकिल अँड.घाटे यांनी केला होता.सदर आदेश हा केवळ २३दिवसात पारीत झाला असुन बरेचसे तडिपारीचे प्रकरणे प्रलंबीत असताना उपविभागीय अधिकारी जळगाव जा.यांनी हे प्रकरणच का इतक्या लवकर निर्णयी काढले हा मोठा चर्चेचा संग्रामपुर तालुक्यात विषय होता.आता या प्रकरणी इतक्या तात्काळ स्थगिती मिळाल्याने सदर आदेश हा आकासापोटि तर पारीत झाला नाही ना अशि शंका जनतेत उत्पन्न होत आहे.कारण मोहणसिंग यांचेवर केवळ १च गुन्हा प्रलंबित आहे हे विषेश.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


