यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांनी केलेले अतिरिक्त साठवण तलाव भ्रष्ठाचाराचे आरोप हास्यास्पद असुन त्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्ठाचाराच्या आरोपा विषयाची सखौल माहीती न घेता नगराध्यक्ष यांना दिलेले समर्थन म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असेच म्हणावे लागेल , अशी प्रतिक्रिया आज यावल येथील नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी अतिरिक्त साठवण तलाव भष्ठाचारा विषयी सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या पत्रकार परिषरेत व्यक्त करण्यात आली . यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहराला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतत्वाखाली नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सहकारी सर्व नगरसेवकांनी मिळुन विकासाचा विधायक दृष्टीकोण समोर ठेवुन गावाला येणाऱ्या कालखंडामध्ये मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता सर्यतीचे पर्यंत करून नगर परिषदला सुमारे १ कोटी ७६ लक्ष रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली व सदरचे काम पुर्णत्वास आले असता, चार दिवसापुर्वी नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे सदरचे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्ठाचार करण्यात आल्याची लिखित तक्रार केली असुन , याविषयाला आता राजकीय वळ्ण मिळाले असुन , काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये या अतिरिक्त साठवण तलावात झालेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी या नगराध्यक्ष यांच्या मागणी समर्थन देण्यात आलेत, याच विषयाला घेवुन आज सकाळी ११ वाजता सत्ताधारी गटातील गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी त्यांच्या गटातील सर्व ११ नगरसेवकांना सोबत घेवुन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांनी केलेल्या अतिरिक्त साठवण तलावातील उभारणीत झालेल्या कामात भ्रष्टाचारा विषयी गंभीर आरोप लावुन याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने नगर परिषदच्या वर्तुळात एकच खळबळ उडवुन दिली असुन , याच विषयाला घेवुन अतुल पाटील यांनी आज उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी , नगरसेवक प्रा . मुकेश येवले , राकेश कोलते , शेख असलम शेख नबी , समिर शेख मोमीन , नगरसेविका सौ . देवयानी धिरज महाजन , सौ .रेखा युवराज चौधरी , सौ . पोर्णीमा राजेन्द्र फालक, शिला श्रीधर सोनवणे , सौ . कल्पना दिलीप वाणी , सौ .रूख्माबाई भालेराव ( महाजन ) यांना सोबत घेवुन , सदरील अतिरिक्त साठवण तलावाच्या उभारणी कामात मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आरोपांना फेटाळुन लावले असुन , नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांच्या संपुर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी हे संपुर्ण विषय हायस्पद तर आहेच पण यातुन यावल शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या नगरसेवकांच्या विश्वासाची प्रतिमा मलीन करण्याचा हा एक प्रकारे राजकीय षड्यंत्र असल्याची माहीती या वेळी पत्रकार परिषद मध्येे देवुन या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय न्यायलयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील यांनी दिली .