यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वेगाने वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल दिनांक २० एप्रिल रात्री ८ वाजे पासुन संचारबंदी च्या संदर्भात नवीन कडक निर्बंध लावले असुन या नवीन नियमावलीनुसार संपुर्ण व्यवसाय सकाळी ७ वाजेपासुन११ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने या नव्या संचारबंदीच्या आदेशाला नागरीकांसह सर्व व्यापारी व व्यवसायीकांनी पहील्याच कडकडीत बंद पाडले आहे . संपुर्ण राज्यात मागील काही दिवसापासुन महाराष्ट्र थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र मृत्युचे तांडव सुरू झाले असुन , राज्य शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याकरीता नविन संचारबंदीची| नियमावली जाहीर केली असुन , काल रात्री ८ वाजेपासून या संचारबंदीची अमलबजावणीस सुरुवात झाली असुन , आज सकाळच्या ७ वाजेपासुन तर सकाळच्या११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने नागरीकांची जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदी साठी एकच गर्दी केल्याचे दिसुन आली ,दरम्यान यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कालच पोलीस वाहनाव्दारे भ्रमणध्वनीद्वारे शहरातील नागरीकांना सुचना देण्यात आले होत्या , या सुचनांची शहरवासीयांनी आपली व्यवसाय कडकडीत बंद प्रशासनाला साथ दिली आहे . यावल बस आगारातुन प्रवासी नसल्याने अखेर काही मोजक्या सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या ही रद्द करण्यात आल्याची माहीती एसटी आगाराच्या सुत्रांकडुन मिळाली आहे. यावलहुन बदलुन गेलेले तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे यावल येथे पुन्हा रूजु झाल्याची ही काही टवाळखोर मंडळीने खोटी अफवा शहरात पसरविल्याने शहरात विविध ठिकाणी धनवडेसाहेब पुन्हा यावल येथे आले का ? अशी चर्चा देखील काही मंडळी करीत असतांना दिसत होती .