या गावामध्ये बरेच वर्षापासून दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार

0
629

 

SURYA MARATHI NEWS

वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम अमरावती जिल्ह्यामधील चांदुर रेल्वे तालुक्यात दानापूर या गावामध्ये बरेच वर्षापासून दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार होत आहे आणि ही लोक ह्या अत्याचाराला कंटाळून ते गावकरी गाव सोडण्या पर्यंत मजल मारतात हे या महाराष्ट्राच्या सभेचे साठी अत्यंत निंदनीय बाब आहे नुकतीच या प्रकरणाची दखल अनुसूचित जाती आयोग याने घेतली असून त्या पीडित कुटुंबांना काही आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली आहे परंतु प्रश्न मदत करण्याचा किंवा नाही करण्याचा हा प्रश्न नाही प्रश्न हा आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडतात अशोभनीय बाब आहे या महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संतांनी जन्म घेऊन ह्या महाराष्ट्राचे नाव लौकिक केले व महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशांमध्ये लौकिक करण्याचं काम या थोर संतांनी आपल्या विचारधारेतून केले अशा थोर संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचे प्रकारण घडणे म्हणजे थोर संतांच्या विचारधारेला मूठमाती देणे असाच होईल हा महाराष्ट्र घडविण्यासाठी ज्या संतांनी आपले आयुष्य पणाला लावलं त्यामध्ये प्रामुख्याने संत नामदेव महाराज संत तुकोबा राया संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज असे अनेक महापुरुषांची नावे घेता येतील परंतु या महापुरुषांच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे कृत्य दानापूर या गावामध्ये घडले जर का कोणी ह्या महापुरुषांच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे कृत्य आणि कार्य करत असतील अशा मनुवादी विचारधारेच्या लोकांना क शासन झाले पाहिजे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम यांच्या वतीने तहसील कार्यालयाला देण्यात आले यापुढे असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडणारच नाही असा प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने करावा अशी आम्ही अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडून बाळगतो जेणेकरून पुरोगामी महाराष्ट्राचे नाव या देशांमध्ये बदनाम होणार नाही याची दखल महाराष्ट्र शासनाने तात्काळ घेऊन या प्रकरणातील सर्व आरोपीवर प्रशासन करावे व त्यांना प्रतिबंधित करावं हीच अपेक्षा आम्ही सर्व निवेदन करते बाळगतो वंचित बहुजन आघाडी या सर्व प्रकरणाचा जाहीर निषेध करतो उपस्थित कार्यकर्ते किशोर उके नागेश पाटील ऍड कुंदन मेश्राम शेषराव चव्हाण देवराव कटके गणेश मस्के दिलीप रोकडे गौरव जामणिक सागर धोंडसे श्रीकांत बागडे नितीन चौधरी विलास डोंगरे निलेश मनवर प्रवीण मडामे बंटी भाऊ बोरकर शामराव कांबळे दीपक बांबर्डे सुरज डोंगरे लेखन इंगळे प्रफुल डोंगरे सुनील भटकर बबन वानखडे गणेश वर राजू भगत ज्ञानेश्वर कोळकर नितीन गोडसे तारसिंग राठोड निरंजन इंगळे सिद्धार्थ वाकोडे रवी राठोड हंसराज इंगळे पपुवाले शालीकराम निमगडे विजय महाजन प्रवीण देशमुख रमजान पपुवाले शे रफिक शे मोहम्मद सचिन ढोके मयूर राऊत भारत जाधव राम चव्हाण अजहर खान शामराव सावंग भाऊराव मोहळ ऍड पंकज सावडे ऍड दिलीप भगत ऍड मनवर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here