वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात १४ ऑक्टोबर रोजी होणारे महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम कोवीड१९मुळे रद्द

0
722

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वनोली येथील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या “श्री साईबाबा देवस्थान व नोली ” या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असून घटस्थापनेच्या नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही या वर्षी १४ऑक्टोबर २०२१ ऑक्टोबर रोजी गुरुवार येत असल्याने या दिवशी महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .यावर्षी कोरोना संसर्गाच्या महामारी संकट अद्याप कायम असल्याने महाप्रसादाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे. असे या मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे

यावल तालुक्यातील हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामनोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी शंभू महादेवाचे पिंडी ची स्थापना व नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आले होते ते आजही तेवत (जळत ) आहेत एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशा साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगता ५६५ वर्षापासुन याठिकाणी हे नंदादीप आजही ही जळतांना दिसत आहे . अष्टमीच्या दिवशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह ह् महाराष्ट्रभरातून व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक प्रसादासाठी याठिकाणी येतात हे त्यावेळी या आमदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले व खऱ्या अर्थाने निधी येण्यास सुरुवात झाली आतापर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागला महाप्रसादासाठी व भाविकांसाठी थांबण्यासाठी आणि सभामंडपाचे काम तसेच बामनोद ते वनोली कोसगाव पाडळसा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नव्हे तर मोर नदीच्या फुलांवर नदीला पूर आल्यामुळे भाविकांना येता येत नव्हते म्हणून कोसगाव वनोली येथे नद्यांमध्ये पूल बांधण्यात आले याठिकाणी पूर्वी गावांमध्ये हे महाप्रसादासाठी खूप गर्दी व्हायची त्यामुळे गावाच्या बाहेर जो विकास झालेला आहे तो युतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने झालेला दिसतो भोजन कक्षासाठी टेकड्यांचे सपाटीकरण ,भक्तनिवास, चौफेर कंपाऊंड संरक्षण भिंत यासाठी करोडो रुपयांचा निधी खऱ्या अर्थानं यावल कृपा माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला . जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रीशेड साठी जिल्हा नियोजन मधून अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत तशी घोषणा ते करणार आहेत . याठिकाणी राजकारणविरहित काम चालतं सर्व गाव एकोप्याने अंगी कारतात सर्वपक्षीय कार्यकर्ते परिसरातील या ठिकाणी येतात व दानही देतात परमेश्वराच्या आराधनेने आपली मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे .
घटस्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करून घटस्थापनेपासून येथील परिसरातील नागरीक कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःला वाहून घेतात अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आश्‍विन शुद्ध अष्टमी यावर्षी दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ गुरुवार रोजी येत असल्याने महापूजा करण्यात येणार आहे व covid-19 चे संकट लक्षात घेता यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी रात्री १५ आक्टोबर २o२१रोजी शुक्रवारी सकाळी देवकाठी नऊ वाजता संध्याकाळी १२ गाड्या ओढल्या जातील अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी वाजत गाजत भगत जुन्या साईबाबा मंदिरावर जातो तिथून आल्यानंतर पूजा झाल्यावर रात्री आठ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो तो रात्री एक ते दोन वाजे पावेतो सुरू असतो या महाप्रसादाचा मध्ये भाविकांना पोटभर प्रसाद दिला जातो त्यात पोळी खिर गंगा फळाची भाजी व उडदाचे डाळीचे वडे हे वीस ते पंचवीस हजार भाविकांसाठी पुरेल एवढा प्रसाद या ठिकाणी केला जातो
या कार्यक्रमास भाविकांनी दर्शन शिस्तीने रांगेत covid-19 चे काटेकोर नियम पाळून घ्यावे आणि संस्थांतर्फे यावेळी सॅनिटायझर वगैरे याचा वापर करण्यात येणार आहे भाविकांनी महाप्रसाद या वर्षी रद्द असल्यामुळे रात्री कोणीही गर्दी करू नये या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मंदिराचे ट्रस्टी हिरालाल व्‍यंकट चौधरी व या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थ यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here