भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील असलेल्या आसरा कॉमर्स आणि सायन्स कॉलेज येथील अनेक विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचे प्रकार सुरू होते. फी घेऊन ऍडमिशन फक्त नावा पुरते करून सर्व फी घेतल्यानंतर त्यांना शेवटच्या वर्षाला तुमचे ऍडमिशन नाही झाले असे सांगणे , प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देणे, दर रोज नवनवीन कारणे देणे अश्या एक ना अनेक तक्रारी मनसे कडे विद्यार्थ्यांच्या मार्फत प्राप्त झाल्या होत्या.
त्या कॉलेज मधील स्टाफ अतिशय वाईट भाषेत विद्यार्थी व पालकांशी हुज्जत घालत होते. साधारण १८ विद्यार्थ्यांचे २ शैक्षणिक वर्ष वाया गेले असताना देखील कॉलेज कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. मागील वेळी मनसे शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष श्री परेश चौधरी यांनी कॉलेज ला दम दिल्यानंतर १८ पैकी १४ विद्यार्थ्यांचे तक्रारींचे निरसन केल्यानंतर देखील ४ विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॉलेजने केले नसल्याने त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान केले. त्यामुळे मनविसे तालुकाध्यक्ष श्री परेश चौधरी व ऍड. सुनील देवरे, श्री गिरीश देव ह्यांनी गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल करत कॉलेजवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली..