विवाहित महिलेचा विनयभंग .. किराणा व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल..

0
475

 

नवरात्रीत मातृशक्तीस वाईट नजरेनी पाहणारा व्यापा-यास  जनतेनी चांगलाच प्रसाद दिल्याची चर्चा.

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे 28 वर्षीय विवाहित महिलेचा किराणा दुकानदाराने विजयभंग केल्याची घटना आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे याविषयी पीडित महिलेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीत पीडित महिलेने नमूद केली की माझे पती , मुले 2 तसेच सासु, सासरे यांच्यासह सुनगाव येथे राहते व आम्ही शेतीचा कामधंदा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आमच्या गावात दिलीप सुंदरलाल राठी यांचे किराणा दुकान आहे आम्हाला काही वस्तु लागल्यास आम्ही नेहमी त्यांच्या दुकानात जात असतो.
दिनांक 04/10/2022 रोजी सकाळी 09/30 या दरम्यान मी दिलीप राठी यांच्या किराणा दुकानात किराणासाठी गेले होते. तेव्हा दिलीप राठी हे मला म्हणाले की, तु तुझे आईवडीलांसोबत का बोलत नाही, तेव्हा मी त्याला सांगीतले की, मी माझे दिरासोबत मोटारसायकल वर बसुन शेतात जात असते म्हणुन लोक माझे, त्यांचेसोबत पाप लावत असतात त्यामुळे माझे आईवडील माझेसोबत बोलत नाही असे म्हटले असता दिलीप राठी मला म्हणाला की, माणसाला ज्याप्रमाणे जेवनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे बाईला ते सुध्दा आवश्यक असते त्यानंतर किराणा घेत असतांना मी एक नारळ दिलीप राठी यांना मागीतले, त्यांनी मला एक नारळ दिले मी त्यांना मोठे नारळ दया असे म्हटले असता दिलीप राठी यांनी वाईट उददेशाने माझेकडे बघुन मला डोळा मारला व म्हणाला की तु मला खुप आवडते. तु आत ये आणी तुला वाटेल ते नारळ घे असे त्यांनी म्हटले त्यामुळे मला लज्जा उत्पन्न झाली म्हणुन मी त्याला म्हटले की, माझे लग्र झालेले आहे तुम्हाला असे म्हणने शोभत नाही असे म्हणुन मी तेथुन निघुन घरी आले व झालेली सर्व हकीकत माझे पती यांना सांगीतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरुद्ध 354अ दाखल केलेला असून पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कैलास चौधरी करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here