शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी रामदास पाटील !!

0
268

 

उरण – रायगड जिल्हा: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मु – नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here