नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा अशी आग्रही मागणी आमदार श्री.राजेश एकडे यांनी राज्याचे कृषी मंत्री मा.श्री.दादाजी भुसे यांच्या कडे आज निवेदना द्वारे केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे शेतीची मशागत करणे बी-बियाणे व खते खरेदी करणे,शेती उपयोगी अवजारे खरेदी करणे अशा विविध कामासाठी शेतकऱ्याला आर्थिक गुंतवणूक करावी लागते परंतु खरीप हंगाम २०२० चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंत मंजूर झालेला नाही परिणामी शेतकरी बांधवांनसमोर गंभीर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मागील १४ महिन्यापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन,कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट,मागील खरीप व रब्बी हंगामात झालेले मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान या मुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे व पुन्हा सावकारी कर्ज काढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.परिणामी आणखी बिकट आर्थिक परिस्थितीला शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागेल.या संपूर्ण बाबीचा सहनुभूतीपूवर्क विचार करून बुलडाणा जिल्हासह मलकापूर विधान सभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा हक्कांचा पीक विमा तात्काळ मंजूर करावा असे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी कृषी मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.