अजहर पठाण सेलू परभणी
भारतीय जनता किसान मोर्चा सेलूच्या वतीनेकरण्यात आली
*सेलू* तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अतिशय बेचैन झालेला आहे. शासनाने जाहीर केलेले निर्णय शासन क्रिकेट मधील खेळा प्रमाणे निकाल वेळोवेळी बदलत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व जे शेतकरी नियमितक र्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम 50,000/- जाहीर करून त्यासंदर्भात देण्याचा निर्णय घेतला होता परंतु अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत आणि प्रोत्साहन रक्कम तर कोणत्याही शेतकऱ्याला जमा करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे पुनर्गठन करून त्यांना पेरणीच्या अगोदर पीककर्ज वाटप करण्यात यावे. अशा महत्त्वाकांक्षी बाबींचा तात्काळ आदेश देऊन कार्यवाही करण्यात यावी.
अशी मागणी दगडोबा जोगदंड पाटिल तालुकाध्यक्ष भारतीय जनता किसान मोर्चा सेलू, महादेव गायके जिल्हा कोषाध्यक्ष परभणी ग्रामीण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, शिवहारी शेवाळे तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा सेलू, जयसिंग शेळके पाटिल, आदींनी निवेदन देऊन तहसीलदार सेलू यांच्याकडे मागणी केली आहे.