सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
अगोदर शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्वतःच्या कुटुंबाचाउदरनिर्वाह भागवत आहे तसेच इतर लोकांना अन्नधान्य पुरवत आहे ‘मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला तसेच अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होत आहे ।अजूनही अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे सुद्धा मिळाले नाही तर काही शेतकऱ्यांना नुसकान भरपाई सुद्धा मिळाली नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पिकवत आहे ! सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी गणेश भुतेकर यांनी .साखरखेर्डा भाग 2 मधील गट नंबर 805 या आपल्या चार एकर शेतामध्ये ‘दोन एकर खाण्याचा कांद्या व दोन एकर मध्ये बियाच्या कांद्याची लागवड केली होती ‘परंतु रात्री-बेरात्री येणाऱ्या रोही मुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत ‘रोही बी रात्री येऊन कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान करत आहे शेतकरी गणेश भुतेकर यांच्या शेतातील ‘साडेतीन एकरातील कांदा पिकाचे रोहि या प्राण्यांनी नुसकान केली असून ‘शेतकरी गणेश भुतेकर हे पुरती हवालदिल झाली आहे ‘त्यांनी वन विभाग मेहकर यांच्याकडे घटनेचा पंचनामा करून नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे !अगोदरच शेतकरी हवालदिल झाला असताना तसेच कोरोनाच्या संकट काळामध्ये शेतमाल अनेक शेतकऱ्यांनी विकलेलाला नव्हता ‘ नैसर्गिक संकट व आता जंगली प्राण्यांचे संकट यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे तरी शेतकऱ्यांना त्वरित नुसकान भरपाई मिळावी एवढीच रास्त अपेक्षा !




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


