संकेत वाघे प्रवास आणि प्रवासातील प्रेरणादायी वाटचाल !

0
590

 

प्रारंभ : हिंगणघाट ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि मुलाखतीसाठी पुणे ते दिल्ली. असा विहंगम प्रवास करीत जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परिक्षेपैकी एक अशी भारतीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSC ची परीक्षा(आपल्या सामान्य जनांच्या भाषेत IAS ची परीक्षा) आज माझा रूममेट, निकटवर्तीय मित्र, भाऊ, आदरणीय संकेत बळवंत वाघे हा UPSC 2020 च्या परीक्षेत भारतातून 266 च्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला…
नागपूर येथे रामकृष्ण मठात सोबत असतांना तसेच पुण्यात एकाच रूमवर एकत्र सोबतीला असतांना प्रत्यक्ष डोळ्यामोरून पाहिलेली त्याची ही यशस्वी वाटचाल आणि हा व्यक्ती भविष्यात लवकरच IAS पदाला गवसणी घालेलच हा त्याच्याप्रती असलेला विश्वास आज सत्यात उतरला.
रामकृष्ण मठ नागपूर येथे असतांना रामकृष्ण परमहंस माँ.शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या शिकवणीत, त्यांच्या कृपेच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली काढलेले ते दिवस आयुष्याची एक नवी पहाट उजळावी असेच होते. आश्रमातील महाराजांचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शन आयुष्याची एक निश्चित दिशा ठरवन्यात आणि त्यावर मार्गक्रमण करण्यात वेळोवेळी खुप मोलाची भूमिका पार पाडली.बालपणापासूनच उच्च बुद्धिमत्तेची देणगी लाभलेला हा विद्यार्थी. शालेय तसेच माध्यमिक शिक्षणातील अभ्यासात उत्तम कामगिरी करत पदवी(B.Sc) शिक्षणासाठी नागपूर येथील प्रतिष्ठित नामांकित अशा ‘शासकीय विज्ञान संस्था(स्वायत्त) नागपूर येथे त्याने प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतांना महाविद्यालया अंतर्गत तसेच राज्यस्तरीय वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत स्वतःतील कलागुणांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आणि त्या स्पर्धा जिंकत विविध पारितोषिकांचा तो मानकरी ठरला. पुढे तेथेच याने M.Sc physics या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल..आपल्या कॉलेज जीवनातील संस्मरणीय असे ते दिवस तो आनंदाने जगला… तिथेही अभ्यासात आपलं सर्वोत्कृष्ट देऊन तो Institute of science मधून B.Sc – M.Sc मध्ये उच्च(प्रथम) श्रेणीत उत्तीर्ण झाला..लागलीच महाविद्यालयाचा चा उत्कृष्ट विध्यार्थी पुरस्कार( Institute of science best student award) सोबतच नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट विध्यार्थी पुरस्कार( RTMNU Best Student award) अशा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होऊन आधीच प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगून असलेला हा विद्यार्थी पुण्याच्या वाटेने निघाला.
पुणे ( Upsc अभ्यास सुरुवात
पुण्यात जाताच ज्ञानप्रबोधिनी येथे Upsc Facilitation Batch 2019 च्या कोर्स ला प्रवेश घेऊन लगेच क्षणाचाही विलंब न करता अभ्यासाला सुरुवात केली.पदवी शिक्षणाला असतांनाच UPSC परिक्षेबद्दल हवी तेवढी माहिती गोळा करत करत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण होईतोवर नागपूर येथेच अभ्यास करून अभ्यासाची पार्श्वभूमी व्यवस्थितरित्या तयार करून ठेवली होती. त्यामुळे पुण्यात जाऊन रीतसर अभ्यास करण्याचा मार्ग त्याच्यासमोर मोकळा होता. निश्चितच ज्ञानप्रबोधिनी येथे झालेल्या प्रवेशामुळे त्याच्या या अभ्यासाच्या प्रवाहाला एक निश्चित अशी वेगळी नवी दिशा मिळाली यात काही शंका नाही. तेथील गुरुजनांनी केलेलं सर्वोत्तम मार्गदर्शन तसेच इतरही बाहेरील गुरुजनांकडून,मित्र परिवाराकडून मिळालेला मार्गदर्शन हा त्याला त्याच्या वाटचालीत अभ्यासात त्याला फार मोलाचं ठरलं..त्याहूनही अधिक म्हणजे त्याने स्वतः घेतलेले परिश्रम त्याचा स्वतःचा अभ्यास आणि आपल्या ध्येयाप्रती असलेली नितांत ओढ ही त्याला इकडे तिकडे बाहेरील मनोरंजनाच्या दुनियेत भरकटण्यापासून एक ढाल बनून सतत त्याच्या सोबत होती.. पहिला Attempt :
दैनंदिन अभ्यासात कुठेही खंड न पडू देता काही महिने नियोजनबद्ध अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर 2019 ची UPSC पहिली prelims दिली हा त्याचा पहिला Attempt होता.. तेव्हा त्याचा अभ्यास बघून सर्वांनाच वाटत होतं की prilims नक्कीच निघेल..त्याचा पण स्वतःवर पूर्ण विश्वास होता. फक्त आता निकालाची तेवढी वाट होती Result लागला आणि त्यात भाऊ पहिल्याच प्रयत्नात prelims उत्तीर्ण..ही खूप त्याच्यासाठी तसेच आम्हा सर्व मित्रमंडळीकरिता सुखद बातमी होती..परंतु त्याच्या आयुष्यात ह्या महत्वाच्या टप्प्यावर एक विघ्न येणं बाकी होत. त्यावर्षी अस झालं की सरकारने सर्व सरकारी सेवेत देशातील आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण लागू केला होता…त्यात याने परीक्षा फॉर्म हा EWS प्रवर्गातून भरला असल्या कारणाने याला वेळेवर EWS चे प्रमाणपत्र काढणे गरजेचे होते आणि ते वेळेत आयोगाकडे पाठवणे अत्यंत आवश्यक होते.. परंतु आपल्या शासकीय व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे ते प्रमाणपत्र वेळेत मिळू शकले नाही…आणि ते प्रमाणात्र जमा करण्याची वेळ निघून गेली अशात UPSC ने ज्यांची EWS प्रमाणपत्रे वेळेत जमा झालेली नाही त्यांना UPSC mains च्या परीक्षेला न बसू देण्याचा म्हणजेच तेथून वगळण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे त्यावेळेस बरेच वादविवाद झाले.शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलं तरी परंतु निर्णय हा UPSC च्या बाजूनेच लागला आणि तो एक अनमोल attempt मुख्य परीक्षा न देताच त्याच्या तसेच त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या हातातून निघून गेला.( नाहीतर हा 2nd attempt देण्याची वेळच अली नसती त्यावेळेस त्याच्या मनाची झालेली अवस्था खरंच डोळ्याने बघवेना झाली होती… मनात सुरू असलेले ते असंख्य विचारांचे वादळ ह्याने इतरांना त्याची जाणीव न होऊ देता स्वतःच मनातल्या मनात थोपवून धरले… पण ते मित्रांपासून कुठे लपून रहायच!..आम्ही सर्वांनी बरंच समजावलं आणि शेवटी त्याने मनाला धीर देत त्या विदीर्ण परिस्थितीतुन काढता पाय घेत पुढाच्या तयारीला लागलेल बर म्हणून ते विचार जे व्हायचं होत ते झालं म्हणून तिथेच सोडून दिले व पुन्हा जोमाने आता 2020 च्या प्रयत्नासाठी अभ्यास सुरू झाला.अजून एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे ह्याने या संपूर्ण प्रवासात स्वतःचा आर्थिक खर्च एका दुसऱ्या अकॅडमी मध्ये शिकवणी वर्ग घेऊन स्वतःच पूर्ण केला.
दुसरा Attempt(prelim) : पुढे काही महिन्यांतच कोरोनासदृश्य जागतिक महामारी सुरू झाली आणि आम्ही सगळे तिथेच अडकून पडलो पुणे सगळं बंद पडल होत.. तेव्हा तशा अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा या पठयाने अभ्यासाची साथ मात्र सोडली नाही आणि अभ्यासाने ह्याची..अभ्यास तसाच सुरू होता. पुण्यातून बाहेर घरी जाण्याची आमची धडपड सुरूच होती.. आणि एकेक म्हणतां सगळेजण काही दिवसांत आपआल्याला गावी सुखरूप निघून गेलो..आणि घरी राहून अभ्यास केला.(माझं पण 2020 चा पहिलाच प्रयत्न होता
महामारीची परिस्थिती पाहता आयोगाने UPSC सेंटर बदलाची संधी विद्यार्थ्यांना दिली आणि सेन्टर नागपूर निवडून घेतल..योगायोगाने आमचं दोघांचं सेंटर हे एकच होत
पुढे काही दिवसांत Upsc prelims 2020 ची परीक्षा नियमांचे पालन करीत पूर्ण झाली आणि काही महिन्यात निकाल लागला इथेही पठ्याने बाजी मारली आणि prelims परीक्षा पास झाला..
(माझं काय झालं ते विचारू नका परिपूर्ण अभ्यास करून दिला attempt पण… सोडा) आणि पुढे mains चा अभ्यास इथेच नागपूर मध्ये राहून करायचा निर्णय त्याने घेतला.आणि एक खोली भाड्याने घेऊन त्यात मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.. बाकीचे सगळे मित्र आपापल्या घरी होते..मी मात्र काही दिवसांनी परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहता पुण्याला निघून गेलो… त्यादरम्यान आमचं फोन वर बोलणं व्हायचं…विचारलं
मी : हॅलो ” संकेत दा काय म्हणतो कसं चाललंय अभ्यास?..
संकेत दा : अरे एकदम मस्त!! फक्त एकट एकट करमत नाही तेवढंच.. पुण्यात किती मस्त होत ना आपलं..सगळे एकत्र खूप बर वाटत होतं..
मी : हो ना रे..खरंच खुप आठवण येते त्या दिवसांची.
संकेत दा: तू सांग तू काय म्हणतो..
मी : मी पण एकदम छान..mains झालं की भेटू परत पुण्यात.
संकेत दा: हो नक्कीच!
मी : बर मग काळजी घे..करा अभ्यास..भेटू लवकरच bye..
संकेत दा: तू पण काळजी घे bye.
अशी एकमेकांची विचारपूस करीत कधीकाळी बोलणं व्हायचं..तेव्हा त्या संवादात याच्या बोलण्यातुन mains च्या तयारीला जो जोश लागतो तो सर्वांगाने झळकत होता…आधीपासूनच पूर्ण विश्वास होता की ह्या प्रयत्नात तर हा नक्कीच mains पास होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरेल आणि शेवटचा निकाल यशपूर्ण असेल..आणि त्या कालावधीतील आमच्यात होणाऱ्या संवादातून त्याच्याप्रती असलेला माझा तो विश्वास एकदम पक्का झाला होता.
मुख्य परीक्षा(Mains) Mains चा सेंटर रायपूर(छत्तीसगड) ला टाकलं होत…”नागपूर वरून जवळ पण पडते आणि तेवढी मुबंई सारखी वर्दळ पण नसते रस्त्यावर म्हणून”…आता इथे पण देवाला ह्याच पण पहायचाच होता बहुदा.. अजून एक विघ्न परीक्षेच्या दिवशीच आला… मुख्य परीक्षेचा पहिलाच GS I चा पेपर आणि परीक्षा सेंटर वर जातांना ह्याचा मोबाईल गाडीत कुठेतरी पडला आणि तो हरवला गेला.. विचार करा या प्रसंगी काय मनस्थिती असेल त्याची.. तरी सुद्धा वेळेचे आणि प्रसंगाचे महत्त्व ओळखून त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठले तिथे रीतसर तक्रार दाखल करून मोबाईल ची सेवा बंद केली..आणि आपला पेपर देण्याकरिता निघून गेला.
“खर सांगायच झालं तर अशा प्रसंगांना हाताळण्यासाठी मनाची स्थिरता खूप लागते.चलबीचल न होता वेळेवर काय तो निर्णय घेवून आपल्या इच्छितस्थळी इच्छित कर्मकार्याला मार्गस्थ होणं हे ही जमायला हवं!!”…आणि हे त्याने यशस्वीपणे केलं आणि तो पेपर सुद्धा उत्तमरीत्या सोडवून आला. पुढे काही दिवसांत mains परीक्षा संपली आणि लागोलाग काही महिन्यांत निकाल पण लागला आणि mains परीक्षा उत्तीर्ण होऊन आपला आपला पठ्ठा मुलाखतीला पात्र ठरला… निकाल लागला आणि जेव्हा हे कळलं की संकेत mains उत्तीर्ण झाला म्हणून तेव्हा सर्वांना आनंदाचा सुखद धक्का बसला….फार बर वाटल आणि आता सगळ्यांच्या मुखातून एकच वाक्य ऐकायला मिळायचं…
अम्म्म “ते इंटरव्ह्यू काय संकेत भाऊच्या डाव्या हाताचा खेळ आणि हो खरंच ज्यांना ज्यांना संकेत दा चा सहवास लाभलंय किंवा ज्यांनी त्याला जवळून बघितलंय त्या सर्वांना ह्याचा अनुभव निश्चितपणे आलेला असेल.
Interview ( दिल्ली) :
मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यावर लगेच काही दिवसांतच त्याची पाऊले पुण्याकडे वळली आणि मुलाखतीला सामोरे ठेवून पुढची अभ्यासाची तयारी सुरू झाली… नंतर काही दिवसांत Mock interview देण्यासाठी दिल्ली गाठली… तिथे वेगवेगळ्या संस्थांमध्ये mock interview देऊन आपल्या तयारीला परिपूर्ण केलं.. शेवटी interview चा दिवस आला आणि आता पुन्हा एकदा नशिबाने या टप्प्यावर सुद्धा पण पाहायचा विचार केला होताच आता एक नवीनच विघ्न समोर उभ येऊन ठाकल होत. दिल्लीला गेल्यावर तिथे अचानक त्याच्या कानाला इन्फेक्शन झाल आणि उजव्या कानाचा पडदा फाटला…लगेच डॉक्टरकडे गेला तिथे डॉक्टर ने सांगितल की कानाचा ऑपरेशन करावं लागेल…आणि हे सगळं घडलं interview च्या 4 दिवसा अगोदर.. समजू शकता मुलाखतीला 4 दिवस बाकी फक्त आणि हा एवढा मोठ्ठा प्रसंग अंगावर धावून आलेला… परंतू ती वेळ आता करो या मरो अशा स्थितीत येऊन ठेपली होती. शेवटी तो तसाच interview ला गेला उजव्या कानाने खूपच कमी ऐकू येत होत..तिथे गेल्यावर त्याने इंटरव्ह्यू पॅनल मधील मॅडम ला आधीच सांगितलं की मॅडम ‘कानाला इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडं जोरात बोला तेव्हा तिथे सर्वांनी समजून घेऊन सहकार्य केलं आणि हे सुद्धा विघ्न टळून interview झाली एकदाची हुश्शहहहह!
इंटरव्ह्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला फोन केला तेव्हा..
मी : हॅलो..काय म्हणतो! कसा झाला इंटरव्ह्यू?
संकेत दा : काही नाही रे एकदम निवांत झाला..
मी : हो का ! किती वेळ चालला
संकेत दा : 25 मिनिटे चालला असेल बहुदा.
मी: अरे व्वा ! मस्त गेला असेल ह…!
संकेत दा : मस्त तर नाही म्हणता येईल..पण गेला ठीक ठाक..बघू आता पुढे काय होईल ते… Result आल्यावर काय ते समजेल..
हा एक मात्र नक्की खुप जण म्हणतात की UPSC इंटरव्ह्यू खुप कठीण असते म्हणून पण मुळात तस काही नसते..एकदम मैत्रीपूर्ण संवाद चालतो..म्हणजे आधी थोडी भीती असते मनात पण त्यांचं ते गोड गोड बोलणं ऐकून भीती एकदम नाहीशी होते…
Mock इंटरव्ह्यू मध्ये जरा जास्तीच करतात..म्हणजे असे काही प्रश्न विचारतात की मुलांना घाबरवून सोडतात एकदम…परंतु तिथे तस काही होत नाही..एकदम निवांत होते इंटरव्ह्यू…
मी : भारीच ह!!! चला आपलं भाऊ कलेक्टर होणार आता..
निकाल कधी लागेल मग?…
संकेत दा : लागेल सप्टेंबर च्या शेवट शेवट.
मी : हो का!! यार पुण्यात आपल्या मधून जवळचा तिथे तुला कुणीच नाही सोबतीला..सगळे गावाकडे आहेत..मी पण दोन महिने झाले गावकडेच अडकलोय.. मी results च्या दिवशी तिथे राहिलो पाहिजे यार तुला उचलून धरायला खांद्यावर.
संकेत दा : हो ये लवकर मग..
मी : हो 26 Sept. चा माझं पेपर झालं की लगेच 27 ला निघतो पुण्याला तोपर्यंत result लागायला नको.
संकेत दा : काही सांगता येत नाही.. लागू पण शकते..
एवढं बोलणं झालं, भेटू आल्यावर इकडे… एवढं बोलून ठेवला फोन आम्ही दोघांनीही आणि
आज 24 Sept लाच अचानक माहिती पडलं result लागला म्हणून आणि निकाल बघतो तर काय आपले संकेत भाऊ UPSC परीक्षा AIR 266 Rank ने परीक्षा उत्तीर्ण झालेले .. मनाला खूप आभाळभरून आनंद झाला..डोळ्यासमोर एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या मन कस तृप्त झालं..पण तिथे निकालाच्या दिवशी पुण्यात त्याच्या सोबत राहून त्याच्या आनंदात सहभागी होण्याची ईच्छा ही मात्र अपूर्णच राहिली,मी माझ्या मनाला : बर काही होत नाही वैभव जातोय ना 27 ला तर भेट होईलच तेव्हा उचलून धर खांद्यांवर म्हणजे झालं समाधान
सारांश.
यश अपघात नाही. हे कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास, त्याग करणे आणि सर्वात जास्त, आपण काय करत आहात किंवा काय करायला शिकत आहात याचे प्रेम” ….
यश मिळवण्याचे कोणतेही गुपिते नाही. हे तयारी करण्याचे, कठोर परिश्रम आणि अपयश होण्यापासून शिकण्याचे परिणाम आहे.
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा संकेत दा आता आजपासून तुझ्या आयुष्यातील नवीन प्रवासास सुरुवात झाली.
तू झालास आता आम्ही पण येऊ तुझ्या पाठोपाठ मार्गदर्शनाचा, निखळ मैत्रीचा आणि शुद्ध अविरत प्रेमाचा हात मात्र असाच आम्हा सर्व मित्रांच्या सदैव सोबत असू दे
श्री रामकृष्ण परमहंस, माँ.सारदा, स्वामी विवेकानंद यांचा आशीर्वाद असंच सदा तुझ्या सोबत राहूदे हीच मनापासून प्रार्थना

तुझाच प्रिय मित्र
वैभव म्हस्के
रामकृष्ण मठ नागपूर ते पुण्यात सोबत असणाऱ्या आम्हा सर्व सहकारी मित्र परिवाराकडून तुझं खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा” तळटीप: तस पाहता वरील प्रवास खूपच संक्षिप्त स्वरुपात मांडलेला आहे. कारण संपूर्ण प्रवासाच वर्णन करायचं झालं तर यावर एक पुस्तकच छापवी लागेल एवढं मी लिहू शकतो आणि लिखाणात तारखेचा उल्लेख मुद्दामच टाळलेला आहे( ते दिवसच असे भराभरा निघून गेले की तारीख तो कागद पे ही रह गयी यारो
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here