गजानन सोटक्के
जळगाव जा प्रतिनिधी:-
कोरोनाच्या काळात तरी ग्रामसेवकांने मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे परंतु जामोद येथील ग्रामसेवक हे मुख्यालयी तर राहतच नाहीत. त्यामुळे जामोद वासियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने खूपच त्रास होत आहे लाँकडाऊन चे नियम पाळण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते गावात ग्रामसेवक राहत तर नाहीच परंतु गेल्या महिन्याभरापासून ग्रामसेवकांनी दांडीच मारली असल्याने गावात लाँकडाऊन चे नियम पाळल्या जात नाहीत जामोद ग्रामपंचायतचा कारभार सध्या ग्रामसेवका अभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याने गावात कोरोनाचे काळात विविध समस्या निर्माण झालेल्या असल्याने जामोद वासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जामोद हे गांव जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव असून येथील लोकसंख्या 20000 चे वर असून येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 + 1=18 असून ग्रामविकास अधिकारी पदाच्या पोस्टची जामोद ग्रामपंचायत असूनही बरेच वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवकच नाही गेल्या तीन महिन्यांपासून महिला सदस्यांसोबत उद्धट वागणूक देणारे वादग्रस्त ठरलेले कैलास चव्हाण यांची जामोद येथून बदली करण्यात आली त्यांचे जागी गेल्या तीन महीण्यांन पासून कस्तुरे नामक ग्रामसेवक देण्यात आले ते काही दिवस महिन्यातून तीन ते चार दिवसच येत होते आणि आता तर गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांचे जामोदात दर्शनच झाले नाही गावात कोरोना चा वाढता शिरकाव सुरूच असतानाही सध्या जामोद ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवकांना अभावी रामभरोसे सुरू असल्याने कोरोनाचे काळात जामोद गावात विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने जामोद वासियांना ऐैन उन्हाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाण्याच्या नाल्या कित्तेक दिवसांपासून साफ न केल्याने सदर नाल्यांमधील सांडपाणी हे रस्त्यांवरून वाहत आहे त्यातच येथील पेठ भागातील पथदिवे हे गेल्या सहा महिण्यांपासून बंदच असल्याने रात्रीच्या वेळेस सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते रात्रीच्या वेळेस अंधारातून व चिखलातून दगडांच्या ठोकरा खाव्या लागत आहेत ग्रामपंचायत ने मागे सुरू केलेली कचरागाडी सुद्धा परत गेल्या पंधरा दिवसांपासून चालकास गेल्या चार महिन्यांपासून पगारच न दिल्यामुळे ग्रामपंचायत समोर शोभेची वस्तू होऊन निकामी उभी आहे गावात सर्वत्र केरकचरा सह घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याने गावात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जामोद वासियांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे ग्रामसेवका अभावी जामोदात विविध समस्या निर्माण झाल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे तसेच ग्रामपंचायतीची विविध कामे रखडली आहेत ग्रामसेवकाच्या दाखल्यासाठी चकरा मारूनही दाखले मिळत नाहीत आता तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जामोद ग्रामपंचायतला स्वतंत्र व मुख्यालयी हजर राहणारा ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी जामोद येथील जनतेकडून होत आहे