सरपंच दाऊत शेठ कुरेशी यांच्या प्रयत्नाला यश ! बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरु !लवकरच मिळेल साखरखेर्डा वासियांना शुद्ध पाणी !

0
767

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जवळपास 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेले सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले साखरखेर्डा गाव ‘नेहमीच पाण्याच्या समस्येने त्रस्त होते . १० वर्षापूर्वी कोराडी प्रकल्पातून साखरखेर्डा गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली . 2002 साली जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले ‘काही दिवसातच ग्रामस्थांना चांगला शुद्ध पाणी मिळायला लागले नंतर काही तांत्रिक समस्येमुळे जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले ..नंतर तत्कालीन सरपंच पुनमताई महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून 2017 साली परत हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले ‘नंतर परत काही कारणास्तव हे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले ‘त्यानंतर आता परत साखरखेर्डा गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नवनिर्वाचित सरपंच दाऊत सेट कुरेशी यांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली ‘व जलशुद्धीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करा ‘ व जलशुद्धीकरण केंद्राच्या मशनरी दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून द्याअशी आग्रही मागणी त्यांनी केली ‘त्यानंतर तात्काळ पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पाणी पुरवठा विभागाला ला आदेश दिले ‘व व तात्काळ जल शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले ‘दाऊद शेठ कुरेशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन आता साखरखेर्डा गावासाठी लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू होईल ‘आत्ता आहे जलशुद्धीकरण केंद्र किती दिवस सुरू राहील हे पाहणे औचित्याचे ठरेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here