अजहर पठाण सेलू/परभणी
सध्या कोरोणा काळात शासनाने कोविड लस उपलब्ध करून प्रत्येक नागरिकांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन केले असतानाच ग्रामीण भागातील अनेक लोक लस घेण्याबाबत उदासीन दिसत आहे. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहीमेत सर्व नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी सहभागी होऊन कोरोणावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सेलू तालुक्यातील अनेक लोक लासिबाबत मनात भीती बाळगून लस घेत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या सेलू तालुकाध्यक्ष सौ. निर्मला बालासाहेब लीपने यांनी महिलांच्या मनातील भीती दूर करून लस टोचून घेण्याबाबत जन जागरण केले व सवतः महिलांना सोबत घेऊन सेलू येथिल उपजिल्हा रुग्णालयात वैदयकीय अधीक्षक श्री. संजय हंबर्डे यांच्या उपस्थितीत महिलांना लस टोचून घेण्यासाठी सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोक या पासून वंचित राहू नये यासाठी राष्ट्रवादी महिला प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.