सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
=कोरोना महामारी मुळे राज्यातील असंख्य शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सरकारने या दोन्ही परीक्षांचा 50% अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित 50 मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, राज्यात 2020-21 या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने काही लिखित परीक्षा घ्याव्यात अथवा ते रद्द करावेत, अशी मागणी शिवसेना विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार व शुभम शेलगेनवार विद्यार्थीसेना उपतालुकाप्रमुख मेहकर व परसराम दांडेकर सो.मी.ता. प्र.लोणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.
कोरोना सारखं महाभयंकर संकट महाराष्ट्रात व संपूर्ण जगात आलेला आहे. या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नुकसान झालेल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागत इंटरनेट मुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षण मिळू शकलेलं नाही. अवघ्या एक महिना शाळा ग्रामीण भागात सुरू झाली होती पण तो सुद्धा कोरोणामुळे पुन्हा बंद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर संदर्भात महत्त्वपूर्ण असलेली परीक्षा म्हणजे दहावी व बारावी ची परीक्षा,अपूर्ण अभ्यास असताना कशी द्यावी हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे.महाराष्ट्र सरकारने जरी विविध माध्यमातून शिक्षण पोचवण्याचं काम केलं असलं तरी ती शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही.20 ते 30 टक्के अभ्यास असताना हा पेपर कसा सोडवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे.सरकारने सर्व बाबींचा विचार कर काही बदल करण्याची मागणी शिवसेना विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार व शुभम शेलगेनवार विद्यार्थीसेना उपतालुकाप्रमुख मेहकर व परसराम दांडेकर सो.मी ता प्र. लोणार यांनी केली आहे .