26/11 शहिदांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित

0
282

 

चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्घुस : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तान प्रेरित दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्यात मोठ्या संख्येने भारतीय व विदेशी निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.

आतांकवाद्यांचा भ्याड हल्ला परतवून लावतांना मुंबई पोलीस दलाचे सैनिक, दहशतवादी प्रतिबंधक दलाचे जवान, भारतीय लष्कराचे जवान हे देशरक्षणार्थ शहीद झाले.
यात पो.कॉ.तुकाराम ओंबाळे, एटीएस चीफ हेमंत करकरे, विजय साळसकर,अशोक कामठे,मेजर संदीप उन्नकृष्णन, व अन्य शिपाही प्राणास मुकले

त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी तर्फे आज काँग्रेस कार्यलयात पुष्पहार अर्पण करून, मेनबत्ती वाहून, मौन ठेवून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
वीर जवान अमर रहे,शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सचिन कोंडावार,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे, संजय कोवे, सुनील पाटील,बंडू झाडे,प्रणय लिंगांपेलली,पोचम बासमपेलली,रंजित राखुंडे,अंकेश मडावी,बाबा जीवने,सुधाकर झुंगरे व अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here