Home राजकारण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन

437

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली जिल्ह्यासह *कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे* व *अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद मूग हळद ऊस व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले* आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून शेतकरी बांधवांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी *नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार संतोषराव बांगर साहेब* यांनी *कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.*